
संजय राऊत बरसले; याची किंमत…
रामदास कदम हा कधीच भरवशाचा माणूस होता. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंचा फोटे लावून त्यांनी पूजा केली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी त्यांना दोनवेळा विधान परिषदेवर पाठवलं, असं कोणत्या पक्षात होतं का?
पक्षाचा दोन व्यक्तींना विरोध होता. एक म्हणजे रामदास कदम आणि नीलम गोऱ्हे. गोऱ्हे यांचं पक्षातलं योगदान काय हा प्रश्न कायम विचारण्यात आला. इतके वर्षे संधी मिळूनही कदम यांना वारंवार विधानपरिषदेवर का पाठवतो असा प्रश्न कायम पक्षातूनच उद्धव यांना विचारण्यात आला. मात्र उद्धव हे दयाबुद्धीचे गृहस्थ असल्यामुळे आपले ज्येष्ठ सहकारी आहेत. त्यांनी १२ वर्षे विधानपरिषदेवर पाठवलं, अशा माणसाने कृतघ्न राहिलं पाहिजे. बाळासाहेबांची मृत्यूनंतर ही लोक विटंबना करतायेत याची किंमत त्यांना मोजावी लागेल हे जबाबदारीने सांगतो. ही किंमत कायदेशीर असेल भावनिक असेल पण यांना जबर किंमत मोजावी लागणार. लाजा वाटल्या पाहिजेत, मी तिथे शेवटच्य क्षणापर्यंत तिथे उपस्थित होतो, आम्हाला माहित आहे तिथे काय अवस्था होती. अनिल परब आज पत्रकार परिषद घेणार आहेत. पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी दाखवून दिल्याचं म्हणत संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेबांनंतर सूत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलीत. उद्धव ठाकरेंनी साहेबांसोबत काम करणाऱ्यांना सन्मानाने वागवलं. महाराष्ट्र आणि मराठी माणूस अशा लोकांवर थूंकत आहे. पद आणि पैसा यासाठी वेडा झालेला माणूस काहीही विधान करू शकतो, असंही राऊत म्हणाले.
रामदास कदम काय म्हणाले?
दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा उद्धव ठाकरे यांनी छळ केला हे मी जबाबदारीने आहे. उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट होऊन जाऊदेत, मी उद्धवजींना विचारलं की शिवेसनाप्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा ते आमचे दैवत आहेत. तेव्हा उद्धवजी मला बोलले की, रामदास भाई मी त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे माझा त्यांना सवाल आहे की, त्यांनी हाताचे ठसे कशासाठी घेतले. दोन दिवस कोणालाही वरती पाठवत नव्हते, शिवसेनाप्रमुखांसारखा आजारी असताना डॉक्टर डिक्लेअर करतात त्यावेळी मला डिक्लेअर करावं लागलं होतं, मी पुढे गेलो होतो. मी इतके वर्षे बोललो नाही पण मी भाषणावेळी ओघाओघात बोलून गेलो. उद्धव ठाकरे ज्या प्रकार स्टेटमेंट देत आहेत ते काही वाघ नाहीयेत, मुखवटा लावलेला असून लांडगा आहेत, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं.