
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा: दि.५ . नांदुरा येथून जळगांव जामोद कडे जाणाऱ्या रेल्वे गेट क्र. २० वरील उड्डाण पुलाचे उद्घाटन होऊन आठ वर्षे होऊन गेली.ह्या रखडलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम लवकर सुरु करण्यासाठी दि ५ मे पासून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले .रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना दिलेल्या लेखी निवेदनात दि.४ मे पर्यंत उड्डाण पुलाचे बांधकामास सुरवात न झाल्यास दि .५ मे पासून धरणे करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.त्यानुसार हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.भुसावळ-नागपूर रेल्वे मार्गावरील काही गेटवर उड्डाण पूल, भुयारी मार्ग आतापर्यंत कार्यान्वित झाले आहेत.ह्या उड्डाण पुलाचे बांधकाम का रखडलेले आहे हे एक कोडेच आहे. ह्या रेल्वे गेटमुळे शेतकरी,विद्यार्थी, व्यापारी,प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी ह्यांना दररोज नाहक त्रास सहन करावे लागत असुन आतापर्यंत मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडले आहेत.ह्यातुन लोकांची सुटका करण्यासाठी व रेल्वे प्रशासनाला जागे करण्यासाठी रेल्वे गेट २० जवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्याजवळ हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे . सर्व पक्षभेद बाजूला ठेवून ह्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे. ह्या धरणे आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड अनिल गायकवाड, कॉम्रेड रामेश्वर काळे,कॉम्रेड विजय पोहनकर, सागर पहुरकर, शे.अत्ताउल्ला,संतोष पाटील, किसन भेरड्या बतासिंग अहिऱ्या, कॉम्रेड जितेंद्र चोपडे, जेष्ट नेते कॉम्रेड दादा रायपुरे एस. एफ.आय चे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सागर पतांडे,संग्रामपूर तालुका अध्यक्ष कॉम्रेड शेख अकबर इत्यादी सहभागी झाले आहेत.ह्या बेमुदत धरणे आंदोलन माजी आमदार चैनसुख संचेती यांनी भेट दिली व ह्यावेळी त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ह्या उड्डाण पुलाचे बांधकाम करण्याबाबत दि.१३ एप्रिल व २२ एप्रिल २०२२ ला दिलेले पत्र धरणे आंदोलन कर्त्यांना दिले.शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता पाटील व उपजिल्हा प्रमुख वसंतराव भोजने ,मनसेचे भागवत उगले यांनी धरणे भेट देऊन पाठींबा जाहीर केला.