
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
ज्येष्ठ पत्रकार तथा ‘चालू वार्ता’ या मराठी दैनिकाचे परभणी जिल्हा उपसंपादक दत्तात्रय वामनराव कराळे यांचा वृतपत्राचे मुख्य संपादक तथा संस्थापकीय संपादक माननीय ज्ञानेश्वर एस्. लोखंडे यांच्या हस्ते आज दि. २५ डिसेंबर २२ रोजी ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील चालू वार्ता दैनिकाच्या पत्रकार-प्रतिनिधींच्या वतीने आयोजित ‘वार्षिक स्नेह मेळावा-२०२२’ या सोहळ्यासमयी श्री. कराळे यांचा सन्मान चिन्हरुपी पुरस्कार, शाल, मेडल आणि माल्यार्पण करून अशाप्रकारे यथोचित गौरव करण्यात आला.
मुखेड येथील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, कवी तथा जिजाऊ मंदीर पब्लिक इंग्लिश स्कूलचे संस्थापक ज्ञानोबा जोगदंड यांच्या भव्य शैक्षणिक वास्तूमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी मुख्य संपादक श्री.लोखंडे सर, त्यांचे काका श्री. लोखंडे, यांचेसह जोगदंड सर, मराठवाड्याचे उपसंपादक ओंकार लव्हेकर, मुख्य संपर्क प्रतिनिधी भरत पवार, लातूर जिल्ह्याचे कार्यकारी संपादक प्रा.मारोती पाटील बुद्रुक, नांदेड जिल्हा उपसंपादक गोविंद पवार, नांदेड जिल्हा प्रतिनिधी विश्वास खांडेकर, प्रा. ग्यानभूरे जयवंत, उप जिल्हा प्रतिनिधी समर्थ लोखंडे, पूण्यातील शिंदेवाडी गावचे सरपंच विकास मोरे, कंधार तालुका प्रतिनिधी माधव गोटमवाड, कौठा सर्कल प्रतिनिधी बाजीराव पाटील कळकेकर यांच्यासह शेकडो पत्रकारांची उपस्थिती लाभली होती. यावेळी उत्कृष्ट पत्रकारितेमध्ये अनेक पत्रकारांचा यथोचित मान-सन्मान करण्यात आला.
प्रारंभी श्री. लोखंडे सर यांच्या हस्ते जागतिक स्तरावरचे भूषण व जाणते राजे तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास, भारतीय घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन व श्रीफळ वाढविला गेला. सदर महापुरुषांच्या आदर्शवत अशा कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला गेला. चालू वार्ता या मराठी दैनिकाच्या उन्नतीसाठी आणि येणाऱ्या काळात ब्रॅण्ड बनविण्यासाठी लोखंडे सरांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. आजमितीला सुमारे दहा लाख वाचकांकडून वाचले जाणारे आपले वृत्तपत्र आगामी काळात घराघरांतून पोहोचले गेले पाहिजे, असाही मौलिक सल्ला दिला. त्याचबरोबर गोर-गरीब, रंजले-गांजले, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक यांना मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रतिनिधींनी सजग राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे. शासन-प्रशासन स्तरावर योग्य त्या पुरावे असूनही दाद मिळत नसेल तर अर्ध्या रात्री मला फोन केला तरी त्यासाठी मी अग्रीम स्थानी राहून न्याय मिळवून देईन असे अभिवचन ही लोखंडे सरांनी दिले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित मान्यवर आणि समस्त पत्रकारांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.