
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
अहमदपूर:-ता. अहमदपूर जि. लातूर येथील अहमदपूर शहरात मधील नळाला दीड महिन्यांपासून पाणी न आल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे़ त्यामुळे प्रभागातील संतप्त नागरिक
अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणी असूनही पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे. शिक्षक कॉलनी येथे दि.१०/०५/२०२२ रोजी पाणी सोडण्यात आले असून आज दि. २८/०५/२०२२ पर्यंत नळाला पाणी नाही १५ दिवसांतून एकदा पाणी येत असून सुद्धा वेळेवर पाण्याची सोय नाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ पाण्यासाठी नागरिकांतून संताप व्यक्त होत असतानाही नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे़ याशिवाय, शहरातील काही भागांत मूलभूत सुविधाही पुरविल्या जात नाहीत.आणि कचरा गाडी पण येत नाही अशी परिस्थिती अहमदपूर शहरात त्रास सहन करत आहेत मुलभूत सुविधांसाठी साजिदभाई मित्र मंडलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले़ पालिकेने तात्काळ पाणी पुरवठ्याचे नियोजन करून चार दिवसांतून एकदा पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली़ आहे