
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी
आता शासकीय योजनेच्या लाभार्थी असलेल्या प्रत्येकाला ई केवायसी करणे अनिवार्य आहे. मग आधार असो, बँकेचे काम असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो, प्रत्येक ठिकाणी ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.
प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आताई-केवायसी करणे बंधनकारक झाले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे रेशनकार्ड धारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचे आवाहन देगलूर चे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी केले आहे.
रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य मिळते. याच धान्य दुकानात ई केवायसी करण्याची सोय आहे.या रेशन दुकानदारांकडे फोर-जी ईपॉस मशीन आहेत, या मशीनद्वारे ही केवायसी केली जाते.यासाठी आधार कार्ड घेऊन जाणे. या ठिकाणी या मशीनमध्ये आधार क्रमांक टाकला जातो.सर्व शिधापत्रिका धारकांची ई-केवायसी करून अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी अन्यथा मोफत धान्य योजनेसह सर्व सुविधा बंद करण्यात येणार आहेत. ई-केवायसी करण्यासाठी स्वस्त धान्य दूकानदार यांच्याकडे संपर्क साधावा किंवा मेरा ई-केवायसी अॅपच्या माध्यमातूनही घरबसल्या मोबाईलद्वारे केवायसी करावी,
घरबसल्या इ -केवायसी
सर्वांत अगोदर प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा राशन हे अँप डाऊनलोड करात्यानंतर अँप चालू करून तुमचा रेशनकार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल.आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमीट या बटणावर क्लिक करा.त्यानंतर आधार सिडिंग या ऑप्शनवर यावे.
त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडिंग Yes किंवा No असा ऑप्शन दिसेल.ज्या सदस्याच्या नावापुढे येस हा ऑप्शन असेल, त्या सदस्याला ई-केवायसी करण्याची गरज नाही. आणि ज्या सदस्याच्या नावापढे नो असा ऑप्शन असेल, त्या सदस्याला ई-केवायसी करणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांचे धान्य बंद होणार त्यासाठी लवकरात लवकर
इ -केवायसी करून घेण्याचे आव्हान देगलूर चे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी केले आहे.