
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जागतिक पर्यावरण दिन कृतीतुन साजरा झाला पाहिजे.वृक्ष लागवड, निसर्ग संवर्धन, आणि निसर्गाचा समतोल राखणे हे फक्त लिहणयापुरत किंवा शोशल माध्यमातून साजर करण्या पर्यंत नाही तर संकल्प करून ते कृती मध्ये उतरविणे आवश्यक आहे.प्राण वायु चा निर्माता निसर्ग आहे . प्राण वायु सह अनेक अशा अनमोल संपदा आपल्यला निसर्गा कडुन मिळालेली देणगी च आहे नव्हे निसर्गाचे आपल्यावर ते अनंत उपकार आहेत . तसेच संबंध जीव सृष्टी हि प्राण वायु वर जीवंत आहे म्हणून प्राण वायु अमुल्य आहे. तर मग निसर्गाचे महत्व किती असल पाहिजे.आणि म्हणूनच निसर्गाचा समतोल टिकला तर सृष्टी वरील मानवासह इतर जीव व्यवस्थित पणे आपलं जीवन जगु शकतात . आणि निसर्गाचा समतोल बिघडला तर जीव सृष्टीला धोका निर्माण होऊन अनेक परिणामांना समस्यांना सामोरे जावे लागु शकते . एकंदरीत निसर्गाचा समतोल टिकण व टिकवणे हे मानवी कल्याणासाठी खूप महत्वपूर्ण आवश्यक आहे. आणि आपण निसर्गाचे संवर्धन केले ,रक्षण केले समतोल राखला तरच येणाऱ्या पिढीच भविष्य उज्ज्वल असेल. या मध्ये यत्किंचितही शंका नाही .निसर्ग हे जीव सृष्टीच सुरक्षा कवच आहे. आणि विज्ञान युगातील मनुष्य हे कवच विकासाच्या नावाखाली नष्ट करण्याचा दिशेने झपाट्याने मार्गक्रमण करत. आहे हि प्रचंड आणि अंत्यत खेदाची बाब आहे. निसर्गाकडुन प्राप्त होणा-या ज्या दुर्मिळ नानाविध संपदा ज्या आपल्या निसर्गाकडून अगदी मोफत मिळतात आपण निसर्गाचे कायम ऋणी असलं पाहिजे .हे सगळं आपल्याला निसर्गाकडून देणगी स्वरुपात मिळतं असताना देखिल आपण आपल्या हव्यासापोटी तसेच वाढत्या गरजा वाढती लोकसंख्या , त्या अनुषंगाने आवश्यक असणार्या सेवा सुविधा निर्माण करताना निसर्गाचा असमतोल निर्माण होत आहे. आणि तो असमतोल पण क्रमप्राप्त आहे.महणजे सेवा सुविधा उपलब्ध करत असतानाच निसर्गरम्य सौंदर्य नष्ट होऊन भौतिक विकास होत आहे. म्हणून मग निर्धास्त पणे निसर्गाचे संतुलन बिघडवायचे का आणि मग जीवनासाठी आवश्यक असणारा प्राण वायु कुठुन मिळणार प्राण वायु चे मुल्य काय याचा अनुभव आपण करोना काळात घेतला आहेच . सगळीकडे फक्त ऑक्सिजन ऑक्सिजन हा हाहाकार होता. आणि हा ऑक्सिजन जर निसर्गा कडुन आपल्याला मोफत निःशुल्क मिळत असेल तर त्याच महत्व आपल्यला किती असलं पाहिजे. परंतु जे मोफत मिळत त्याच महत्व ओळखण्या मध्ये सध्या चा मानव कमी पडत आहे . आणि म्हणूनच तो निर्धास्त पणे वृक्षांची कतल करत आहे . वायु प्रदुषण प्रचंड वेगाने वाढवत आहे . घानकचर व्यवस्थित व्यवस्थापन न करता तो निसर्गाच्या समतोलात भर घालत आहे.महणुन दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे.हे कुठं तरी थांबलं पाहिजे . मानवी गरजा पण आवश्यक आहेत . म्हणून निसर्गाचा असमतोल करणं योग्य नाही . म्हणून आवश्यक असणार्या गरजा पूर्ण करताना होणार निसर्गाचे नुकसान टाळण आवश्यक आहे. आणि ज्या प्रमाणात निसर्गाचे नुकसान होत आहे .समतोल बिघवडला आहे .त्याच प्रमाणात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून वायु प्रदूषण टाळून, कृतीतून निसर्गाचे संवर्धन करणं आवश्यक आहे .आणि भविष्यातील येणाऱ्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी निसर्गाचं संतुलन टिकवून त्याच संवर्धन आणि रक्षण करण आवश्यक आहे .जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत निसर्गाचा समतोल बिघडणार नाही.वसुंधरेच जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते टिकुन रहिल आणि आपल्या पुढील पिढीच भविष्य सुरक्षित राहिल. जगातील पर्यावरण दिनानिमित्त एवढीच माफक अपेक्षा निसर्ग रक्षण संवर्धन हे कृतीतून झालं पाहिजे.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301