
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
चंद्रपूर
महिला व तरुणींच्या कला गुणांना वाव देणारे महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं हे एकमेव व्हाॅटसअप गृप असल्याचे मनोगत आज विजयादशमीच्या दिनी सातारा जिल्ह्यातील पाचवडच्या मुळ रहिवाशी असलेल्या जागतीक पुरस्कार विजेती कवयित्री अर्चना सुतार यांनी व्यक्त केले. एका शाळेत शिक्षिका असणा-या अर्चना सुतार या बुधवारी संध्याकाळी या प्रतिनिधीशी (भ्रमनध्वनीवरून )बोलत होत्या त्यांनी बोलतांना उपरोक्त प्रतिक्रिया दिली.या गृप वर निव्वळ चंद्रपूर गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यातीलच महिला व तरुणीं नाही तर महाराष्ट्रातील अनेक नामवंत महिला साहित्यिक, मेकअप आर्टिस्ट, शैक्षणिक, सामाजिक व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणांऱ्या कलावंत व महिला जुळल्या असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.गत आठ वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील वरुड या एका छोट्या गावी वास्तव्य करणारी अभियंता कु. रितू लोहकरे यांचे संकल्पनेतून या गृपची निर्मीती करण्यांत आली.बघता बघता आजच्या घडीला या गृपवर शेकडों महिलां व तरुणी ह्या गृपच्या सदस्या झाल्या आहे. सदरहु गृप अल्प कालावधीत नांवरुपास आला असुन खरोखरचं यातील काही जेष्ठ सदस्या नवोदित तरुणींसाठी प्रेरणादायी ठरल्या आहे.सहजं सुचलं महिला गृपच्या मुख्य मार्गदर्शिका उपराजधानी नागपूरच्या मायाताई कोसरे , व राजूराच्या जेष्ठ साहित्यिका अधिवक्ता मेघा धोटे ह्या आहेत. उपरोक्त गृप वरील अनेक नवोदित सदस्यांनी कला व साहित्य क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त केले हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.विशेषता महाराष्ट्रातील वणीच्या विजया तत्वादी, क्रीडापटू कु.सायली टोपकर ,पथ्रोडच्या जेष्ठ साहित्यिका विजया भांगे , मूलच्या सुपरिचित कवयित्री स्मिता बांडगे ,चिमूरच्या कवयित्री वर्षा शेंडे,या शिवाय सामाजिक कार्यकर्त्या नागपूरच्या नयना झाडे ,चंद्रपूरच्या वंदना हातगांवकर , छबूताई वैरागडे, चंदा वैरागडे, भद्रावतीच्या किरण साळवी , रजनी रनदिवे , संगिता भोयर ,नंदिनी लाहोळे , चैताली आत्राम,सुविद्या बांबोडे, सिमा पाटील, मुंबईच्या श्रुती उरणकर ,वर्षा आत्राम , मूलच्या वंदना आगरकाठे ,कल्याणी इटनकर, वर्षा कोंगरे , भाग्यश्री हांडे ,संगिता चिताडे, जास्मिन शेख , मंथना नन्नावरे,शारदा मेश्राम, प्रियंका मेश्राम, आदीं अनेक महिला व युवती या गृपच्या सदस्या झाल्या आहेत.