
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :-एक हजार चारशे बाव्वन्न मतदार संख्या असलेल्या अंजनगांव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समीती निवडणुकीत १४३४ मतदारानी १८ संचालक पदाचे दावेदारी करीता मतदानाचा हक्क बजावला.यात ९८.७६ टक्के मतदान झाले.ग्रामपंचायत मतदारसंघातुन ४२८ पैकी ४२४ मतदारानी,सेवा सहकारी संस्था मतदार संघातुन ६८७ पैकी ६७८ मतदारांनी,व्यापारी अडते मतदारसंघातुन ६६ पैकी ६४ मतदारानी तर हमाल मापाडी मतदार संघातुन २७२ पैकी २६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
सायंकाळी अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीचे मोजनी सुरु झालयावर प्रथम मत मोजणी झालेल्या व्यापारी अडते मतदारसंघातुन शंकरराव चोरे ३१,चंद्रशेखर शेळके ३५ मते घेऊन विजयी झाले.तर आशिष राठी २८,पंकज मोदी २८,ज्ञानेश्वर पोटदुखे ३ मते घेऊन पराभुत झाले.हमाल मापारी मतदारसंघातील शेख जमील शेख रहेमान ९१ मते घेऊन विजयी तर विरोधी मुजफ्फर अली सय्यद अली ६१ सै नईम ८४ मते घेत पराभुत झाले.ग्रामपंचायत मतदारसंघातुन सहकार पॅनलचे प्रदिप इंगळे १७० मते घेत वीजयी झाले तर परीवर्तनचे उमेदवार प्रेमदास हिरोळे १६७ मते घेऊन पराभुत झाले,हरिश सरदार ४२,शकुंतला वानखडे (अपक्ष) ८ मते मिळाली,ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदार संघातुन परीवर्तन पॅनलचे एकमेव उमेदवार रवी उपाध्ये १५५ मते घेत सहकारचे शशीकांत मंगळे १३८ यांना पराभूत केले.यामध्ये शेतकरी पॕनलचे प्रदीप येवले ९४,रवि बोद्रे ००,मते पडली.
सर्वसाधारण मतदार संघातुन सहकार पॅनलचे अमर शिंगणे १४८,अनंता रोकडे १४८,मते घेऊन विजयी झाले.यात परीवर्तन पॅनलचे नितीन पटेल १४६ व विनोद घोगरे १४६ मते मिळवुन त्यांना पराभव स्विकारावा लागला.
सोसायटी मतदार संघ-इतर मागासवर्ग मतदार संघातून सहकार पॅनलचे सुरेश आडे यांना ३३६ मते तर परिवर्तन पॅनलचे जगन हरणे यांना ३१५ मते पडली तर सुरेश आडे यांचा २० मताने विजयी तर,भटक्या विमुक्त मतदार संघातुन सहकाराचे विशाल पंडीत ३४१ मते मिळवून परीवर्तन पॅनलचे स्वप्नील घुरडे २९८ यांचा पराभव केला.महीला मतदारसंघातील सहकारच्या शारदा ढोक यांना ३५० मते,पुनम पोटे यांना ३३६ मते मिळवुन विजयी झाल्या तर परीवर्तन च्या रजनी काळमेघ २८५,सुवर्णा रिंगणे २८० यांचा पराभव झाला.सर्वसाधारण मतदारसंघातुन सहकाराचे सर्वच्या सर्व जयंत जी.साबळे ३६४,सुरेश ना.राऊत ३१९,अविनाश सदार ३२७,विजय द.कळमकर ३०८,विकास म.येवले ३३१,संजय काळमेघ ३२१,सागर घोगरे ३२९ विजयी घोषीत करण्यात आले.तर परीवर्तन पॅनलचे उमेदवार सुधिर गो.अढाऊ २९९,रामभाऊ काळमेघ ३०७,कुलदिप नळकांडे २८९,राजेंद्र भारसाकळे २७५,अजिक्य सं.महेकरे ३००,विनायक वाघ २६२,शरद रा.साबळे २६३ या सर्व उमेदवारांचा पराभव झाला.परीवर्तनचे चार उमेदवारांनी फेरमोजणी (रीकांउंटींग) मागतल्याने फेरणतमोजणी करण्यात आली.यामध्ये नितीन पटेल १४८,अमर शिंगणे १४८ व विनोद घोगरे १४८ यांना सारखीच मते पडल्याने अत्यंत अटीतटीच्या लढतील निवडणूकीत लहान मुलींच्या हातुन ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली.त्या ईश्वर चिठ्ठीत अखेर अमर शिंगणेच विजयी झाले.