
परळी वैजनाथ प्रतिनिधी
परळी तालुक्यातील नागपिंपरी मांडेखेल येथील 33 केव्ही सब स्टेशनचे महावितरण कंपनीकडून काम सुरू करण्यात आले नाही नाही. यासंदर्भात त्यांनी नागापूर सबस्टेशन येथील जळालेला ट्रांसफार्मर दुरुस्त करावा व नागपिंपरी मांडेखेल सब स्टेशनचे काम त्वरित सुरू करावे याकरता 29 तारखेचा अल्टिमेटम महावितरण कार्यालयाला दिला होता. महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गेल्या 27 तारखेला 5 केव्ही चा नागापूर सबस्टेशन मधील ट्रांसफार्मर बसवल्यामुळे एक मागणी पूर्ण झाली आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे तसेच या प्रकरणात जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अभियंता साहेब महावितरण कार्यालय लातूर यांनी तात्काळ लक्ष घालावे अन्यथा महावितरण कार्यालय परळी आणि अंबाजोगाई कार्यालयाचे ऑफिस उघडू देणार नाही तसेच एक दिवस अगोदर नोटीस देऊन आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा लोकनेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी महावितरण कार्यालयाला दिला आहे.
या संदर्भात अंबाजोगाई महावितरण कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री. वाघमारे साहेब आणि परळीचे महावितरण कार्यालयाचे कार्यकारी उपअभियंता श्री. अभिजीत राठोड साहेब यांच्याशी चर्चा केली त्या चर्चेनंतर शेतकऱ्यांना गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये वीज मिळत नव्हती त्यानंतर सहा तास वीज मिळू लागली परंतु आता या महिन्याच्या 30 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत नागापूर आणि मोहा परिसरातील शेतकऱ्यांना 6 तासाऐवजी 10 तास विज मिळणार आहे असे नागापूर जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य प्रदीप भैय्या मुंडे (बबलू सेठ) यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात गेल्या आठ दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री , बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी साहेब बीड, मुख्य अभियंता महावितरण लातूर तसेच संबंधित महावितरण कार्यालयाचे अधिकारी यांना नागपिंपरी सबस्टेशनचे काम सुरू करावे आणि नागापूर सबस्टेशन मधील जळालेला ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करावा या मागण्यांचे निवेदने पाठवण्यात आली आहेत आणि विविध वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
33 केव्ही सबस्टेशनचे काम त्वरित सुरू करा त्यासाठी महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी बोलून तात्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा परळी महावितरण कार्यालय आणि अंबाजोगाई महावितरण कार्यालयाचे कार्यालय बंद करू तसेच जिल्हाधिकारी साहेब बीड आणि मुख्य अभियंता साहेब लातूर यांनी तात्काळ लक्ष घालून सबस्टेशनचे काम पूर्ण करण्याच्या महावितरण कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला आहे.