अजित पवार चैत्यभूमीवर दाखल झाल्यानंतर स्थानिक नागरिक अजित राणे यांनी नारळी बागेतील अस्वच्छतेबाबत त्यांच्याकडे तक्रार केली. बागेची अवस्था खूप खराब आहे. तसेच गार्डनमधील निकृष्ट खेळण्यांवरुनही तक्रार केली. तसेच एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे, पण स्वछता नाही आणि झाडांना पाणी घातले जात नाही, बागेची काळजी घेतली नाही अशा अनेक तक्रारींचा पाढा अजित पवारांसमोर त्यांनी वाचला. तक्रारीनंतर अजित पवार यांनी तातडीने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना फोन लावला आणि याबाबत विचारणा केली. त्यावेळी आयुक्तांना मी पाहतो, असं उत्तर दिलं. यानंतर इतर अधिकाऱ्यांना देखील अजित पवार यांनी जाब विचारला.
दादरच्या चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयायींची मोठी गर्दी होत असते. दादरच्या चैत्यभूमीवरील प्रेक्षक गॅलरी अर्थात व्युइंग गॅलरी स्वच्छ नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दरवर्षी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. मुंबई महानगरपालिकेकडून याची तयारी करण्यात येते. मात्र मुंबई महापालिकेकडून यंदा सोय नीट न झाल्याच्या तक्रारी अजित पवारांकडे करण्यात आल्या. त्यानंतर अजित पवारांनी थेट महापालिका आयुक्त इक्बाल सिंहाना फोन करून याबाबत विचारणा केली. त्यावेळी आयुक्तांना मी पाहतो, असं उत्तर दिलं.अजित पवारांच्या फोननंतर काही मिनिटातच इक्बाल सिंह तेथे पोहचले.