
दै. चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिचे बियाणे व खत आणि औषधे मिळण्यासाठी खरीप हंगामासाठी बियाणे व खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी खतांची साठेबाजी होणार नाही यासाठी तालुका पातळीवर समिती नेमून प्रत्येक दुकानदारावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती नेमिने त्या समितीमध्ये शेतकरी प्रतिनिधी असावे २०२०च्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे बोगस देण्यात आले व शेतकऱ्यावर तीन वेळा पेरणी करण्याची वेळ आली होती. २०२० कोरोना संसर्गामुळे शेतीमाल विक्रीसाठी अनेक अडथळे निर्माण होऊन आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले तेव्हा २०२४ खरीप हंगामासाठी समिती नेमून शेतकऱ्यांची लूट थांबवावी अशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष व्यंकट जाधव. पांडुरंग कंधारे शरद गायकवाड यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे व तहसीलदार कंधार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.