
नऊ महिन्यांपूर्वीच ‘या’ ज्योतिषाने केली होती युद्धाची भविष्यवाणी !
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील सध्याचा तणाव पुढील १५ दिवसांत गंभीर वळण घेईल का? हा ज्योतिषी स्वामी योगेश्वरानंद गिरी यांचा तर असा दावा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी नऊ महिन्यांपूर्वीच २५ मे ही तारीख २९ जुलै २०२४ निश्चित केली होती.
त्यांनी रणवीर इलाहाबादिया यांच्या पॉडकास्टमध्ये म्हटले होते की, ३० मे पर्यंत ग्रह आणि ताऱ्यांची स्थिती अशी होत आहे की, ज्यामध्ये महाभारतासारखे भयानक युद्ध झाले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे , जेव्हा ज्योतिषीने नऊ महिन्यांपूर्वी हे सांगितले होते, तेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धासारख्या कोणत्याही परिस्थितीची चर्चा झाली नव्हती.
ज्योतिषी यांनी आधीच २५ मे ही तारीख दिली होती…
ज्योतिषी स्वामी योगेश्वरानंद गिरी यांनी नऊ महिन्यांपूर्वी त्यांच्या भाकितात म्हटले होते की, ‘३० मे च्य आसपास ग्रहांचे एक समीकरण येत आहे. त्यानुसार हे सहा ग्रह एकमेकांशी एक स्थिती बनवत आहेत. ही अशी स्थित आहे, जी महाभारताच्या किंवा मोठ्या युद्धांच्या वेळी ग्रहांनी तयार केली होती. हे सर्व गणितीय आहे, ते फक्त कोणीतरी म्हटल्यामुळे घडत नाही. हे एक सूत्र आहे. या सूत्रावरून तुम्ही तुमचे स्वतःचे निष्कर्ष काढू शकता.
नऊ महिन्यांपूर्वी असे म्हटले होते की…..
ते पुढे म्हणाले की, जागतिक युद्धाचे समीकरण तयार होत आहे. ‘त्या समीकरणाच्या आधारे मी किमान असे म्हणू शकतो की, हा भारतासाठी सुवर्णकाळ आहे.’ भारत पूर्णपणे त्याच्या यशाच्या शिखरावर आहे. याबाबत महर्षी अरविंद यांनी हे सांगितले, विवेकानंद तसेच आपले राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनीही हे सांगितले. त्यांनी ते वैज्ञानिक आधारावर सांगितले. तुम्ही या घडणाऱ्या गोष्टी पाहू शकता. मग ज्योतिषी स्वामी योगेश्वरानंद गिरी म्हणतात की, ‘जर तुम्ही तुमचे डोळे पूर्णपणे बंद केले असतील किंवा हे गृहीत धरले असेल की, तुम्हाला काहीही पाहायचे नाही, तर देव तुमचे भलं करो’. मी गोष्टी घडताना पाहू शकतो, असे त्यांनी म्हटले.
युद्ध का निश्चित आहे?
जेव्हा ज्योतिषी स्वामी योगेश्वरानंद गिरी यांना विचारण्यात आले की, आणखी एक जागतिक युद्ध होईल का? तेव्हा त्यांनी लगेच हो असे उत्तर दिले. ज्योतिषशास्त्रीय गणिते हेच सांगतात का? यावर स्वामी योगानंद म्हणतात, ‘हे देखील ड्यू आहे. युद्ध हे होईल कारण तो पुनरुज्जीवनासाठी केलेला यज्ञ आहे. युद्ध म्हणजे एक यज्ञ आहे. यज्ञ या शब्दाला इंग्रजीमध्ये sacrifice म्हटले जाते, ज्याचा अर्थ त्याग असा होतो. यज्ञ, दान आणि तपस्या…
गीतेच्या १८ व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मीही या तीन गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाही. कृष्णालाही त्याग, दान आणि तपस्या करावी लागते.
सर्व ग्रह-नक्षत्र भारताच्या बाजूने
ज्योतिषी स्वामी योगेश्वरानंद गिरी पुढे म्हणतात की, शांततेनंतर नेहमीच युद्ध होते. जेव्हा तुमच्या सभोवतालचे सर्व काही ठीक असते आणि शांततेचे वातावरण निर्माण होते. सर्व काही थंड आहे, म्हणून बर्फ थोडा वितळवण्यासाठी उष्णता द्यावी लागते. युद्ध हा यावरचा एक उपाय आहे. ते म्हणतात की, भारताला संरक्षण मिळत आहे. मी म्हणालो होतो की, हा भारताचा सुवर्णकाळ आहे. भारत जगाला आपली ताकद दाखवणार आहे. भारत संयुक्त राष्ट्रांमध्ये व्हेटो पॉवर घेऊन येणार आहे. भारत लवकरच संयुक्त राष्ट्रांमध्ये एक मजबूत स्थान मिळवणार आहे, असेही ज्योतिषी स्वामी योगेश्वरानंद गिरी यांनी म्हटले आहे.
ज्योतिष आणि भविष्यवाणीची परंपरा
खरं तर, निसर्ग अस्तित्वात आल्यापासून अंदाज लावण्याची परंपरा सुरु आहे. अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी अंदाज लावणे हा एक प्रमुख आधार आहे. आपण धोक्यांचा अंदाज घेतो आणि नंतर त्यांना तोंड देण्याची तयारी करतो. जर आपण भाकित करू शकलो नाही, तर धोका आपल्याला घेरून टाकेल.
ज्योतिषशास्त्रात भाकित करण्याची परंपरा आहे. हे प्रत्यक्षात भविष्यातील संभाव्य परिस्थितीचा अंदाज आहे. ज्योतिषशास्त्र पूर्णपणे ग्रह आणि ताऱ्यांच्या स्थितीवर आधारित गणितीय सूत्रांनी नियंत्रित केले जाते.
ज्योतिषी योगेश्वरानंद गिरी यांनी केलेल्या भाकितांच्या दृष्टिकोनातून जर आपण भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाच्या परिस्थितीकडे पाहिले तर हे सिद्ध झालेले दिसते. जर २५ ते ३० मे दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठे युद्ध झाले, तर ज्योतिषाने अगदी अचूक भाकित केले होते असे निश्चितच मानले जाईल.