
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी –
भिवंडी / ठाणे
बौद्ध साहित्य प्रसार संस्था महाराष्ट्र कार्यकारणीचे अध्यक्ष कवी भटू जगदेव यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रमनी बौद्ध विहार, भिवंडी येथे कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मान्यवरांच्या हस्ते महामानवांना पुष्प – पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. वंदना घेऊन कविसंमेलनाची सुरुवात करण्यात आली.
बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष कवी नवनाथ रणखांबे यांनी , “आम्ही बौद्ध साहित्याचे संवर्धन , निर्मिती, प्रचार आणि प्रसार करीत असून वामनदादा कर्डक यांची जन्मशताब्दी वर्षे , भीमा कोरेगाव शौर्य दिन, आणि नूतन वर्षाचे औचित्य साधून वैचारिक विचारांची पेरणी करण्यासाठी कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. मानवतावादी समतेच्या महामानवांचे विचार जनमानसात आम्ही पेरत आहोत ” असे प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे महाराष्ट्र कार्यकारणीचे आणि कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी भटू जगदेव , बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे महाराष्ट्र कार्यकारणीचे कार्याध्यक्ष गजलकार नवनाथ रणखांबे, प्रदेश कार्यकारणी संघटक कवी वसंत हिरे, कोकण विभाग अध्यक्ष गजलकार नरेश जाधव , शाहीर मास्टर राजरत्न राजगुरू, गजलकार विजयकुमार भोईर, कवी संदीप कांबळे, कवी उदय क्षीरसागर, कवी अक्षय भोईर , कवी भगवान गायकवाड आदी कवींच्या कवितेने नववर्षाचे जोरदार स्वागत करीत प्रबोधनात्मक वैचारिक विचारांचा जोरदार जल्लोष भिवंडी शहरात करण्यात आला.