दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- तालुक्यातील भवरदयाचापाडा-मोख्याचापाडा मार्गावर अनेक वर्षांपूर्वी बांधलेला अरुंद फुल पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या पाण्याखाली सतत जात असल्याने या पाड्यांचा जव्हार शहराशी पूर्णपणे संपर्क तुटून दोन्ही गावातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतो म्हणून पत्रकार संरक्षण समितीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोकरे यांनी पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्याकडे निवेदन देत या पाड्यांना जोडणाऱ्या नवीन फुल बांधण्याची मागणी केली आहे.६५० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावातील लोकांना पावसाळ्यात या अरुंद पुलाचा शालेय विद्यार्थी,पलीकडील शेतकरी व रुग्णांना पर्यायी रस्ता नसल्याने मोठी अडचण निर्माण होते.या निवेदनात टोकरे यांनी कौलाळे ग्रामपंचायत हद्दीतील फणसपाडा-भवरदयाचा पाडा ते मोख्याचापाडा रस्त्याची अतिशय वाईट दुर्दशा झाली असल्याने हा रस्ता सुद्धा डांबरीकरण करून देण्याची मागणी त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे केली आहे.


