दै.चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
महापुरुषांचे अनुयायी जोपर्यंत जीवंत आहेत तो पर्यंत विचारांच्या माध्यमातून महापुरुष जिवंत राहतात..
अजिंक्य भैय्या चांदणे यांचे मत…
महापुरुषांचे अनुयायी जोपर्यंत जीवंत आहेत तो पर्यंत विचारांच्या माध्यमातून महापुरुष जिवंत राहतात असे मत अजिंक्य भैय्या चांदणे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
येथील जोशाबा पुरुष बचत गट व समस्त मातंग समाजाने 18 ऑगस्ट रोजी आद्यकीय मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अजिंक्य भैय्या चांदणे बोलत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त व्याख्यान, गुणवंत विद्यार्थी सन्मान आणि समाज प्रबोधन पर गीताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पृथ्वीराज साठे तर प्रमुख व्याख्याते म्हणून म्हणून ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री लक्ष्मण माने व डीपीआईचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे उपस्थित होते.
यावेळी विचार मंचावरून बोलताना अजिंक्य भैया चांदणे पुढे म्हणाले की, जो पर्यंत महापुरुषांचे अनुयायी जिवंत असतात तो पर्यंत महापुरुष विचाराच्या माध्यमातून जिवंत राहतात. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त
जोशाबा बचत गटाच्या वतीने अशा पद्धतीचे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन महापुरुष अण्णा भाऊ साठे यांचे विचार जिवंत ठेवण्याचे कार्य करत आहे हे खुप कौतुकास्पद आहे.
उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आपल्या भाषणात बहुजनांनी आता एकत्रित होऊन अन्यायी व्यवस्थेच्या विरुद्ध एल्गार केला पाहिजे असे मत व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोपात माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी बहुजन समाजातील तरुणांना ज्या ज्या ठिकाणी अडचण निर्माण होईल त्या त्या ठिकाणी एक मोठा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी असेल असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाबुराव जोगदंड यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. संदिपान हजारे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश सरवदे यांनी केले तर आभार प्रदर्शन नवकेशर डान्स ड्रामा अँड ऍक्टींग अकॅडमीचे भीमाशंकर शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमात बळीराम उपाडे या प्रसिद्ध शाहीर व गायक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रबोधन पर गीते सादर करून प्रेक्षकांचे व मान्यवरांचे मन जिंकून घेतले. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवकेश्वर ड्रामा अँड अॅक्टींग अकॅडमी चे भिमाशंकर शिंदे, जो शा बा बचत गट मातंग समाजातील सर्व कार्यकर्ते जोगदंड तुळशीराम , वैरागे बालासाहेब, वैरागे शिवाजी, वेंकट वैरागे पांडुरंग गाडेकर, संदिपान हजारे ,शिवाजी जोगदंड ,लक्ष्मण खरात, शरद देडे ,अनंत कांबळे ,भीमाशंकर शिंदे ,साधू गायकवाड ,राम जोगदंड ,दीक्षांत जोगदंड यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांनी प्रभावित झालेला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
