
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
जिगाव (नांदुरा)दि.१३.जिगाव प्रकल्पात जिगाव शेतकऱ्यांचे, २०१६ पासुन आक्षेपामुळे पैसे पडून होते. व ते पैसे आता गायब झाले आहेत.
जिगाव येथील गट नंबर २७३ व २७४ या गटावर श्रीमती रेखा वर्मा जिगाव यांनी आक्षेप घेतलेला होता. त्यामुळे या गटाचे पैसे थांबून होते. मलकापूर सिव्हिल कोर्टामध्ये तीन वर्षे केस चालल्यानंतर, निकाल लागला असता जिल्हाधिकारी मध्यम प्रकल्प मा. घुगे साहेब बुलढाणा यांनी पैसे टाकतो म्हणून सांगितले परंतु पैसे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नव्हते. पैसे गेले कुठे ? तेथे असलेला सौर बाबू, यांनी पैसे पाठवले असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु पैसे आम्हाला मिळाले नाही.परत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पण पैसे वापस गेले नाहीत. मग पैसे गेले कुठे ? मा घुगे साहेबांनी सर्व माहिती, विचारण्यासाठी मोताळा तहसील ला बदली झालेले सौर बाबू यांना बोलावले परंतु त्यानी येण्यास नकार दिला, शेवटी त्यांनी तहसिलदारामार्फत रवी सौर यांना नोटीस पाठवली ११/०५/२०२२ रोजी त्यांना बुलढाण्यात बोलावन केलं तरीपण ते बुलढाणा येण्यास नकार देत आहे. तीन शेतकऱ्यांचे पैसे गेले कुठे ?, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे उपोषण करण्यासाठी २९/४/२०२२ रोजी निवेदन दिले ९/५/२०२२ रोजी उपोषणाला बसणार होतो. परंतु अप्पर जिल्हाधिकारी भू संपादन मध्यम प्रकल्प बुलढाणा मा. घुगे साहेबांनी विनवणी केली म्हणून ऊपोषण तात्पुरत स्थगित ठेवले रवी सौर अव्वल कारकुन याला नोटीस देऊन बोलवतो असे साहेबांनी सागीतले.व ११/०५/२०२२ रोजी नोटीस पाठवली परंतु रवी सौर कारकुन यायला तयार नाही.यावरून अस वाटत आहे की, यानी, प्रमोद लक्ष्मन भोजने, बिबाजी निनाजी बाजोडे
नामदेव हरीभाऊ भोजने
या,शेतकऱ्यांचे पेसे, गायब केलेले आहेत,
मा जिल्हाधिकारी साहेब आपणास विनंती आपण स्वतः लक्ष घालून जिगाव प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या पैशाचा सोमवार दि. १६/०५ पर्यंत शोध लावण्यात यावा अन्यथा दि. १७/५ ला आम्हाला लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी.