
दैनिक चालु वार्ता जालना आकाश नामदेव माने
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले जे मध्यप्रदेश मध्ये होऊ शकतो ते महाराष्ट्रात का होऊ शकत नाही असा संतप्त सवाल प्रत्येक ओबीसी समाजाचा व्यक्ती आज विचारतो आहे आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आपलं राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाजातील प्रत्येक व्यक्ती संघर्ष करण्यासाठी तयार आहे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
मध्यप्रदेशातील राज्य सरकारने ओबीसींसाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या अटींप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाचे नेमणूक केली ओबीसींचा इमपेरिकल डेटा तयार केला ट्रिपल टेस्ट ची अट पूर्ण केली आणि तेथील ओबीसी आरक्षण टिकले परंतु महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांचा सरकार म्हणून कुरघोडी करत सत्तेत आलेले सत्ताधारी मात्र केवळ वसुली करण्यात मग्न आहे आहेत ओबीसींच्या इंटरिकल डेटा ट्रिपल टेस्ट किंवा राज्य मागासवर्ग आयोगाच्या निवडणुकीबाबत ब्र शब्द न करता केवळ केंद्र सरकारच्या नावाने आरडाओरड करण्यात धन्यता मानत होते परिणामी ओबीसींचे हक्काचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले यासाठी पूर्णतः राज्य सरकार जबाबदार आहे जे मध्यप्रदेशमध्ये होऊ शकतो ते महाराष्ट्रात का नाही? असा संतप्त सवाल त्यामुळेच प्रत्येक ओबीसीच्या मनात आहे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
राज्य शासनाच्या या मूर्खपणाचा निषेध करण्यासाठी सरकारला ओबीसींची ताकद दाखवून देण्यासाठी ओबीसींच्या न्याय हक्काचं राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात व भाजयुमोचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत *उद्या दिनांक २१ मे २०२२ शनिवार रोजी सकाळी १०:०० वाजता विडोळी फाटा मंठा* येथे भव्य रस्ता रोको आंदोलन तर त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी विचार विमर्श व्हावा या उद्देशाने *श्री गणेश मंगल कार्यालय संत तुकाराम नगर ऊस्वद रोड मंठा येथे ओबीसी परिषद* चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ………. यांनी दिली
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन …….विक्रमराजे उफाड तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा……… यांनी केले आहे