
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -किशोर वाकोडे
बुलडाणा
२२ वर्ष काँग्रेससोबत निघून गेले होते. त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवण्याची गरज नाही. आम्ही शिवसेनेविरुद्ध बंड केले नाहीतर उठाव केला असल्याचे प्रतिपादन आ.संजय गायकवाड यांनी केले. आ. गायकवाड मंगळवार ५ जुलै बुलडाणा विधानसभा मतदार संघात परतले असतांना पावसात त्यांचे स्वागत मातोश्री जनसंपर्क कार्यालयापुढे शेकडो शिवसैनिकांनी मुसळधार पध्दतीने केले.आ. संजय गायकवाड यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले. याप्रसंगी भाजपाचे नेते योगेंद्र गोडे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. आ. संजय गायकवाड पुढे म्हणाले की, ज्यावेळेस हा सर्व घटनाक्रम घडत होता त्यावेळेस कार्यकर्ते तर सोडाच परंतु बायको व मुलेही चिंतीत होती. ते परत बोलावत होते, परंतू त्यांना वेट अॅण्ड वॉच एवढेच सांगत होतो. त्यांनी यावेळी सर्व घटनाक्रम कार्यकर्त्यापुढे मांडला २१ तारखेपासून २७ तारखेपर्यंत आमची केवळ एकच मागणी होती.
ती म्हणजे काँगे्स राष्ट्रवादी सोबतची आघाडी तोडा. मात्र साहेब राष्ट्रवादीला सोडायला तयार नव्हते. काँग्रसचे चिल्लर कार्यकर्ते चौकाचौकात टिंगल टवाळी करत होते. काँग्रेसचे इथले माजी आमदार आम्हाला शिव्या द्यायचे भविष्यात लढाई यांच्या-सोबत होती. त्यामुळे आमदारांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्यण घेतला, असे आ. गायकवाड म्हणााले, संजय राऊत आम्हाला डुक्कर रेडे, गटार म्हणत होते. आमचे पुतळे जाळायला सांगत होते. संजय राऊतने राष्ट्रवादीकडून शिवसेना संपविण्याची सुपारी घेतली होती. असा आरोपही त्यांना केला हे सगळं घडत असतना १५ दिवसाआधी खा. जाधव यांच्या सोबत चर्चा झाली होती यापुढील काळात एकनाथ शिंदे यांना बुलडाणा शहरात बोलवणार असून त्यांच्या माध्यमातून बुलडाणा शहराचा व जिल्ह्याचा विकास करणार असल्याचे आ. गायकवाड म्हणााले भाजपासोबत आमची नैसर्गिक युती होती. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्याला आता पुन्हा चांगले दिवस येणार आहेत आता या पुढील नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूक व सर्व निवडणुकाआता भाजपला सोबत घेऊन लढविणार असल्याने एकमत झाल्याचे आ. संजय गायकवाड यांनी सांगितले.