
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- राज्यासह जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढत असतांनाच चांदूरबाजार तालुक्यातही या जनावरांच्या साथीच्या रोगाने पशुपालकात दहशत निर्माण केली.तालुक्यातील खराळा,बेलोरा आदी गावात लंपीची लागण झालेल्या जनावरांची संख्या अधिक आहे.या दरम्यान शिरजगाव कसब्यातील एका बैल आजाराने बळी पडला आहे.आजारावर नियंत्रण,उपाय व अतिरीक्त औषधोपचार करण्यासाठी,औषध खरेदीसाठी आ.बच्चू कडु यांनी आपल्या आमदार निधीमधुन २० लाख रुपयाची तरतुद केली असून तसे पत्र त्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
जिल्हासह तालुक्यात गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला असून या आजारावर वेळेत लसीकरण,उपाय व उपचार झाले नाही तर मोठ्या प्रमाणात मरतुक होऊन पशुपालकांचे नुकसान होऊ शकते.याकरीता राज्य शासनाने जिल्हा वार्षीक योजने मार्फत जिल्ह्याला एक कोटीची तरतुद केली आहे.ही तरतुद केवळ लसीकरण व औषधोपचारासाठीच खर्च केली जाणार असल्याने पशु या आजारातून बरा झाल्यानंतर त्याला लागणाऱ्या जीवनसत्व व इतर उपचारासाठी अतिराक्त औषधींची गरज पडणार आहे.गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणुजन्य लंपी चर्मरोग नियंत्रणात आणण्याकरिता औषधोपचार तथा रोग प्रादुर्भाव पश्चात उपाययोजना करण्याकरिता अतिराक्त निधी लागणार आहे.
वेळेत लंपी प्रादुर्भाव नियंत्रणात आणणेकरिता औषधोपचार तथा रोग प्रादुर्भाव पश्चात उपाययोजना करण्याकरिता अचलपूर विधानसभा मतदार संघाताल प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखन्यात मेडीकल बँक तयार करण्यात यावी.जेणेकरुन लंपी या विषाणुजन्य आजारापासून पशुंचे व पशुपालकांचे कोणतेही नुकसान होणार नाही,याकरिता आ.बच्चु कडु यांनी स्थानिक विकास निधीतून अचलपुर मतदार संघाकरीता रु.२० लक्ष इतकी तरतुद केली असून सदर निधीचा लंपी निर्मुलन व उपचारासाठी उपयोग करण्याकरिता आपल्या स्तरावरुन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना तात्काळ आदेशित करावे असे पत्र आ.बच्चू कडू यांनी जि.प. सीईओ यांना दिले.
सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे-आ.बच्चू कडू
शेतकरी व पशुपालक आपल्या जनावरांच्या भरवश्यावर राबराब राबुन आपल्याला अन्न देतो.आज त्याच्याच पशुवर संकट उभे ठाकले असतांना त्यांच्या पाठीशी उभे राहुन त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.त्यासाठी पादुर्भाव पश्चात लागणाऱ्या औषधीसाठी आम्ही पशुऔषधी कंपणीच्या एम.आर सोबत संपर्क साधून मोफत औषध मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत.इतर लोक प्रतिनिधीनीही अशा प्रकारे निधी उपलब्ध करुन दिल्यास पुर्ण राज्यातील पशुपालकांना दिलासा मिळेल.