दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी –
लातुर/अहमदपुर: तालुक्यात सध्या कृषी उत्पन्न बाजारा समिती निवडणूक रंगात आली असून सर्वच नेते ,उमेदवार आपली ताकद अजमावत आहेत.सर्व राजकीय,समाजिक,जातीय समीकरणाची गोळा बेरीज चालु आहे.त्या मध्ये तालुक्यात बहुसंघ्य असलेला धनगर समाज हा भारतीय जनता पार्टी सोबत असल्याचे अनेक निवडणुकीतील निकालाच्या माध्यमातून लक्षात येते.पण सध्या भा.ज.पा.ने जाणीव पूर्वक धनगर समाजातील कार्यकार्यत्यांना उमेदवारी दिली नाही एका उमेदवाराला उमेदवारी दिली तो व्यक्ती सुशिक्षित नाही त्यांचा तितकासा राजकीय वावर नाही अस त्यांच्या समाजातील लोकांचं मत आहे.भा.ज.प.ने या निवडणुकीत मराठा-6,वंजारी-3,रेड्डी-3,लिंगायत -2 अशी जातीनिहाय उमेदवारी दिली इतर समाजापेक्षा धनगर समाजाचे सदस्य तालुक्यात जास्त असताना उमेदवारी जास्त मिळायला हवी होती अशी समाजात चर्चा आहे.तर राष्ट्रवादीने धनगर समाजाचे 2-3 उमेदवार रिंगणात उतरवत समाजाच्या ताकदीला न्याय दिल्याचे बोलले जात आहे. समाजातील चांगले उमेदवार जाणीवपूर्वक डावलून कमकुवत व्यक्तीला उमेदवारी देऊन समाजाची राजकीय ताकद कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असून येणाऱ्या काळात भा.ज.पा.ला धडा शिकवनार अस खाजगीत काही धनगर समाजातील नेते, कार्यकर्ते म्हणत आहेत.
