
संभाजी राजेंचा सवाल..!
कॉंग्रेसचे मुख्यमंत्री असतांना अशोक चव्हाण, आर. आर. पाटील यांनी याआधी राजीनामा दिला आहे, मग ते पुन्हा सत्तेत आले. धनंजय मुंडे यांनी आता मोठ्या मनाने राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही सुद्धा तसेच पुन्हा सत्तेवर या.
वाल्मिक कराड तुमचा जवळचा माणूस आहे. हे मान्य करता तरीही हे सर्व चालू आहे. मला आश्चर्य आहे. मुख्यमंत्री अजित पवार यावर शांत कसे ? यांना संरक्षण का देताय? या धनंजय मुंडेंमध्ये असं काय आहे, त्याला एवढं घाबरताय. कुठल्याही सामान्य माणसाला बीडमध्ये विचारलं, हे सात जण कोणाचे ? वाल्मिक कडाड कोणाचा ? उत्तर एकच येणार, सरकार का घाबरतय ? अशी टिका माजी खासदार संभाजी राजे यांनी केली आहे.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ही माणूसकीची हत्या आहे. ओबीसीमध्ये आहे, म्हणून धक्का द्यायचा नाही का ? काल सर्वपक्षीय राज्यपालांना भेटले, त्यामध्ये ओबीसी सुद्धा होते. ओबीसी मराठा, या पलीकडचा विषय आहे. ही माणूसकीची हत्या आहे. महाराष्ट्रभर हे पसरलं, तर छत्रपती शिवाजी महराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला हे परवडणार आहे का ? असाही सवाल त्यांनी केला. तसेच संतोष देशमुख यांचा भाऊ, मुलगी यांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला जावं लागतं हे चुकीचं आहे. असेही ते म्हणाले.
आम्ही मूर्ख आहोत का? “अजितदादांच मला आश्चर्य वाटतं. परखडपणे विषय मांडता. छोट्यात छोट्या मुलाला विचारलं, यात दोषी कोण? खून कोणी केला? सगळं सांगतिलं, तरी अभय देता. काल सकाळी राज्यपालांना भेटलो. त्यानंतर मंत्रालयात गेलो होतो, त्यावेळी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात अर्धातास चर्चा झाली. एवढी चर्चा करता, म्हणजे काहीतरी विषय असणारच ना.नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला गेलो होतो, आम्ही मूर्ख आहोत का? हे सगळं बंद करा” असं संभाजी राजे यांनी सुनावलं.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या काही दिवसांपासून विरोध चांगलेच आक्रमक झाले आहेत. यासोबतच काल राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे यांनी चर्चा केली. यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे का? अशी राजकीय वर्तुळात चर्चेतील मात्र आज मंत्रालयात कॅबिनेटच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे पोहोचले असता मी काही राजीनामा दिला नसल्याचं त्यांनी प्रतिक्रिया दिले आहे.