
अजित दादांनी कुणाला भरला दम ?
आईसारखं कुणी नसतं. मी पण ज्यावेळेस बारामतीत येतो त्यावेळेस आईला भेटतो. आज मला भरपूर कामे आहेत. मात्र रात्रीच मी आईला भेटलो. दर्शन घेतलं. तिच्याशी गप्पा मारल्या, आईशी अतिशय आपलेपणाने वागा.
कारण आपण समाजात जन्म घेतलाय तो आपल्या आई-बापामुळे. त्यामुळे शेवटपर्यंत जीवात जीव असेपर्यंत त्यांना विसरू नका”, असं आवाहन करत अलीकडची नवी पिढी आई-बापाकडे नीट बघत नाही. हे वागणं बरं नव्हं, असा टोला देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. बारामतीत सावित्री हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
“काही जण चुका करत आहेत. रस्त्यावर कचरा टाकत आहेत. कृपा करून ज्या गोष्टी केलेल्या आहेत. जनावरे चरायला सोडत आहेत. मी त्यांना कृपा करून सांगतो, आता ती जनावरे कोंडवड्यात घातली. नाही ऐकलं तर त्यांना बाजार दाखवतो. आता जे मालक लोक आहेत, त्यांना निर्वाणीचा इशारा देतो ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर मालकांवर केसेस होतील”, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
ज्यांची गाढव आहेत, जनावरे आहेत, ज्यांच्या गाई इकडेतिकडे फिरत असतात, तुम्ही तुमच्या दारात बांधायचे ते बांधा. काय खायला प्यायला घालायचं ते घाला. बारामती जी चांगली करतो ती काय सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाही”, असं अजित पवारांनी सुनावलं.
‘त्याला टायरमध्ये घेऊन असा झोडायला सांगणार’
“कधी कधी मोटरसायकलवाले इकडे तिकडे बघतात. हळूच ओव्हरटेक करतात, राँग साईडने जाण्याचा प्रयत्न करतात. असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असा झोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजेत”, असा दाम अजित पवारांनी दिला. “अजिबात नियम कोणी तोडू नका. मग तो अजित पवार असो किंवा अजित पवाराचा कोणी नातेवाईक असेल. सर्वांना नियम सारखा. मी जे करतो ते बारामतीकरांसाठी सर्वांसाठी करतो”, असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.
मी अनेक ठिकाणी झाडे लावली आहेत. तिथे कोणी पण येत आहे. जनावरे खात आहेत, तसं चालणार नाही. जिथे माणसांना बसायला केलं आहे तिथे एक जण मोटरसायकल घालून निवांत मांडी घालून लोकांसोबत गप्पा मारतोय. गाडी वळवली आणि पोलिसांना सांगितले याची गाडी ताब्यात घे आणि याला चांगला टायरमध्ये घाल तो म्हणतोय नाही दादा चुकलं”, असं अजित पवार म्हणाले.
“मी ज्याच्यामुळे बारामतीला होतो, तेव्हा पहिलं आईकडे जातो. कालच बारामतीला आलो. आईकडे गेलो दर्शन घेतले. गप्पा मारल्या. प्रत्येकाने आईशी प्रेमाने आपलेपणाने वागावं. आपण समाजात आपल्या आई-बापामुळे आहोत. जीवात जीव असेपर्यंत आई-बापाला विसरू नका.काही नवीन पिढी आई-बापाकडे नीट बघत नाही. त्यांना सांगतो हे वागणं बरं नव्हं, असंदेखील अजित पवार म्हणाले.