 
                10000 कोटींसाठी हालचाली सुरू…
टाटा समूहाची शान ‘महाराजा’च्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मागील काही महिन्यांपासून एअरलाईन्स वेगवेगळ्या अडचणींशी झुंज देत असून त्यांनी टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सकडून 10000 कोटी रुपयांची आर्थिक मदत मागितली आहे, असे ब्लूमबर्गच्या अहवालात सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे.
जूनमध्ये अहमदाबादमध्ये एअरलाइन्सचे एक विमान कोसळले होते.
वर्षाच्या मध्यात 12 जून 2025 मध्ये झालेल्या प्राणघातक विमान अपघात, ज्यामध्ये 240 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, एअर इंडियाच्या प्रतिष्ठेला गंभीर धक्का बसला. ही दुर्घटना कंपनीची प्रतिमा सुधारण्याच्या आणि ताफ्याचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का ठरली.
विमान दुर्घटनेनंतर टाटांची एअरलाईन्स संकटात
एअर इंडियामध्ये टाटा समूहाचा 74.9%, तर उर्वरित हिस्सा सिंगापूर एअरलाइन्सकडे हिस्सा आहे. वृत्तानुसार, एअर इंडियाने प्रणाली आणि सेवा सुधारण्यासाठी टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्सकडून मदत मागितली असून कंपनीला अभियांत्रिकी आणि देखभाल पथकांना देखील बळकटी द्यायची आहे.
ब्लूमबर्ग अहवालानुसार, एअर इंडिया त्यांच्या प्रणाली आणि सेवा सुधारण्यासाठी तसेच अभियांत्रिकी आणि देखभाल विभागांना बळकट करण्यासाठी निधीची मागणी करत आहे. अशा परिस्थितीत, प्राप्त होणारा कोणताही निधी मालकांना प्रमाणानुसार वितरित केला जाईल. हा निधी व्याजमुक्त कर्ज म्हणून दिला जाईल की इक्विटीच्या स्वरूपात याबाबत मालक निर्णय घेतील.
एअर इंडियाचे जूनमध्ये विमान दुर्घटनाग्रस्त
लंडनच्या दिशेने रवाना एअर इंडियाचे विमान जूनमध्ये अहमदाबादमध्ये कोसळले होते, ज्यामध्ये 240 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाला अंदाजे 4000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षामुळे मे महिन्यात पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. पण, एअर इंडियाने अद्याप या अहवालावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अहमदाबाद विमान अपघात
एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी अलीकडेच सांगितले की, अहमदाबाद विमान अपघाताच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या प्राथमिक चौकशी अहवालात एअरलाइनच्या कामकाजात किंवा पद्धतींमध्ये कोणताही दोष आढळला नाही. एव्हिएशन इंडिया 2025 समिटमध्ये बोलताना विल्सन म्हणाले की, जुलैच्या अहवालात एअर इंडियाच्या कार्यपद्धतीत किंवा विमान देखभालीत असे काहीही चुकीचे नाही जे बदलण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष काढला गेला.



 दै चालु वार्ता
                                        दै चालु वार्ता                     
                 
                 
                