
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
संयम हे जीवनातील उत्कृष्ट बळ आहे . तसेच यशस्वी जीवनाचा पाया आहे . प्रगतीचे पहिलं लक्षण संयम आहे . मन , बुद्धी, विचार या मध्ये संयम निर्माण झाला तर जीवनातील यशोशिखरावर पोहचण्या पासुन आपल्याला कोणतीही शक्ती रोखु शकत नाही.महणुन संयम हे जीवनातील ब्रह्म अस्त्र आहे .त्याचा वापर आपण ज्या पद्धतीने करणार त्या पद्धतीने परीणाम आपल्याला पाहायला मिळणार म्हणून संयम गुणवत्ता आणि विद्वत्ता हा यशोशिखरावर पोहचण्यासाठी राजमार्ग आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही .
साधारणतः पृथ्वीवर जन्मला आलेला प्रत्येक व्यक्ती आणि हा सारखाच गुणवान, विद्वान असतो . परंतु आपल्या गुणवत्ता आणि विद्वत्ता आपण कोणत्या कार्यासाठी वापरतो त्यावर त्यावर त्याच महत्व अवलंबून असतं आणि गुणवत्ता आणि विद्वत्ता याला जर संयमाची जोड आपण देऊ शकलो तर आपलं जीवन यशस्वी आणि उन्नत, प्रगत, आणि नावलौकिक करणार होईल या मध्ये काही च संदेह नाही .निसर्गाने पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव सजीव निर्माण केले त्यापैकी मानव एक सजीव प्राणी आणि निसर्गाने निर्माण केलेली प्रत्येक व्यक्ती जवळपास सारखीच असते थोडाफार अंशतः बदल शरिर रचनेत, चेहरा, उंची या मध्ये थोडा फार फरक असतोच . निसर्गाने प्रत्येकाला समान प्रमाणात सर्व शारिरीक बाबी वाटप केल्या आहेत . अपवादाने काही व्यक्तिंना एखाद्या अवयव कमी प्रमाणात असतो . कुणाला ऐकायला येत नाही .कुणाला दिसत नाही. तसेच कुणाला बोलता येत नाही.तसेच एखाद्याला एखाद्या अवयव नसेलही पण प्रत्येकाला मेंदू आणि बुद्धी हि सर्वांना सम प्रमाणात निश्चितच दिलेली आहे. आणि मेंदू मधील रचना घटक जवळपास सारखेच आहेत परंतु त्या मेंदू चा वापर आपण ज्या पद्धतीने करतो . त्यानुसार आपली विद्वत्ता ठरतो .आणि विद्वत्ता गुणवत्ता आणि संयम एकत्र असेल तर यशाचा त्रिवेणी संगम तयार होतो . महणुन प्रत्येक व्यक्ती मध्ये प्रचंड अशी विद्वत्ता आणि गुणवत्ता असते च परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब हि संयम आहे .आणि हा संयम प्रत्येकाकडे असेल च असे नाही .गुणवत्ता आणि विद्वत्ता प्रचंड असूनही संयमा शिवाय यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येत नाही. अनेक विद्वान लोकांची उदाहरणे आहेत विद्वत्ता, आणि गुणवत्ता प्रचंड होती परंतु संयम नसल्याकारणाने त्यांना सुद्धा अपयशाचा सामना करावा लागला .वास्तविक गुणवत्ता विद्वत्ता आणि सयंम हा त्रिवेणी संगम ज्याच्याकडे आहे .तो सदैव यशोशिखरावर असतो. यशा पर्यंत पोहचण्यासाठी फक्त गुणवत्ता आणि विद्वत्ता असुन चालत नाही .तर उच्च पराकोटीचा संयम खुप आवश्यक आहे.विषय कुठल्याही क्षेत्रात नावलौकिक करण्याचा असो किंवा काला , क्रीडा, संस्कृती, शिक्षण, उद्योग, व्यवसाय, नोकरी, रोजगार स्वयंरोजगार, यापैकी कुठल्याही क्षेत्रात आपल्याला यशोशिखरावर गाठायचे असेल किंवा आपलं नावलौकिक करण्याचा आपला मानस असेल तर गुणवत्ता, विद्वत्ता, आणि संयम हा त्रिवेणी संगम अति आवश्यक आहे . ज्याने संयमवार विजय मिळवला त्याच्या साठी जगातील कुठलच यश अशक्य नाही.महणुन गुणवत्ता, विद्वत्ता आणि संयम हा यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी राजमार्ग आहे
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र
तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक
बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301