
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानावरून राज्यात वादंग निर्माण झालं आहे
अश्यात विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोश्यारींच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे. “राज्यापालांचं विधान वैयक्तिक, त्याच्याशी आम्ही सहमत नाही”, असं शिंदे म्हणाले आहेत. “राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्याच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई मिळाली. बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहीत आहे. उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा केला. राज्यपालांनीही खुलासा केला आहे. राज्यपाल हे मोठं पद आहे. संविधानिक पद आहे. त्यामुळे कुणाचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मराठी माणसाच्या त्याग आणि योगदानाची अवहेलना करता येणार नाही. मराठा माणसाच्या मेहनतीवरच मुंबई आर्थिक राजधानी बनली आहे. इतर राज्यातील लोक आणि समाजातील लोक व्यापार करतात. मुंबईचं जे महत्त्व आहे. त्यामुळे होत असतं. त्यामुळे त्याचं श्रेय घेता येत नाही. मराठी माणसाची अस्मिता कुणालाही हिरावून घेता येणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ते माध्यमाशी बोलत होते.