
दैनिक चालु वार्ता किनवट प्रतिनिधी दशरथ आंबेकर
दि,४ नोव्हेबर ईस्लापूर पासून जवळच असलेल्या इरेगाव येथील गणपत लक्ष्मण बेदरे, या शेतकऱ्याचे शेतातील जागलीवर गाय गोरे बांधले असता वाघाने हल्ला करून गोऱ्याला ठार मारले तसेच गाईला घायाळ केले .सदरील शेतकऱ्याचे सुमारे तिस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे..
आज दिनांक चार नोव्हेंबर रोजी सदरील घटनेची माहिती गणपत लक्ष्मण बेदरे, यांनी तात्काळ वन विभाग ईस्लापुर याना माहिती दिल्याने घटनेचा पंचनामा वनपाल गुद्दे ,वनरक्षक सय्यद , यांनी केला. तर पशुवैद्यकीय अधिकारी दीक्षा मोरे ,यांनी शवविच्छेदन केले. सदरील शेतकऱ्याचा गोरा ,दोन वर्षाचा असून किंमत सुमारे तिस हजार रुपयांचा असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे..