
दैनिक चालू वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि :अन्वर कादरी
औरंगाबाद, अकोला, अहमदनगरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटना हा भाजपचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
राज्यात गेली काही दिवस झाले ठिकठिकाणी दोन गटात होणाऱ्या वादामुळे हिंसाचाराच्या घटना घडताना दिसून येत आहे. औरंगाबाद येथील किराडपुरा भागात देखील असाच हिंसाचार झाला होता. तर अकोल्यातही असाच हिंसाचार पाहायला मिळाला. तर काल अहमदनगरच्या शेवगावमध्ये दगडफेक करण्यात आली.
चंद्रकांत खैरे पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत जनता महाविकास आघाडीलाच मतदान करेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात कुठेही जातीय तेढ निर्माण झाली नाही. पण आता औरंगाबाद, अकोला आणि शेवगावमध्ये दोन गटात वाद झाला. राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यापासून वातावरण खराब झाले आहे. गृहमंत्री फडणवीस असताना या सर्व घटना घडत आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या बाजूने उभे असल्याने असे प्रकार घडवले जात आहे. हिंदू आणि मुस्लीम यांना वेगळ करण्यासाठी यांच्याकडून राजकारण सुरु आहे. त्यामुळे दोन गटात होणारे वाद घडवले जात आहे. मुस्लीम मतदान उद्धव ठाकरे यांना मिळू नयेत म्हणून हा सर्व प्रकार सुरू आहे. तर हा सर्व घटना म्हणजेच भाजपचे लोकसभा निवडणुकीचा प्लॅन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पराभवामुळे कामाला लागले
चंद्रकांत खैरे म्हणाले की, कर्नाटकात भाजपला पराभवाला समोरे जावे लागले आहे. म्हणून खासदारांना मतदारसंघात राहत काम करण्यासंदर्भातील यूचना देण्यात आल्या आहेत. त्यांना लोकसभा हवी आहे. मात्र, जनतेने आता महाविकास आघाडीला मतदान करण्याचे ठरविल्याचा दावा ही त्यांनी यावेळी केला आहे. तर औरंगाबादचे एमआयएमचे खासदार जलील यांना नावाला विरोध करण्यासाठी भाजपनेच आंदोलन करण्यास सांगितले होते असा आरोपही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.