
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची झाली चाळनी
देगलूर: देगलूर तहसील व उपविभागीय कार्यालया समोरून बेधडक रस्त्यांवर क्षमतपेक्षा अधिक वजन ओव्हरलोड वाळू वाहतूक करून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविला जात आहे. ओरलोड वाहतूक करण्याची स्पर्धाच लागली आहे का?.आरटीओंच्या पथकालाही हुलकावणी देत ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांची दहशत वाढली असल्याचे चित्र सर्रास दिसत आहे. अनेक वाहनांची वजन वाहून नेण्याची क्षमता नसतानाही क्षमतेपेक्षा दोन ते तीन पट वाळू वाहून नेण्याची स्पर्धाच सुरू आहे. विशेष म्हणजे प्रत्येक हायवा टिप्पर यावरे ग्रीन मॅट बांधलेली असल्यामुळे वजन करण्याचे कष्ट आरटीओ अथवा पोलीस टाळतात. काही टिप्पर व हायवाला नंबर पाटी सुद्धा दिसून येत नाही याचा
फायदा टिप्पर हायवा चालक घेत आहेत. वाळू वाहतुकीतून सर्वात जास्त वजनांचे नियम मोडीत काढले जात आहेत. टिप्पर अथवा ट्रॅक्टरमधून वाळू वाहतुकीने सर्वांनाच जेरीस आणले आहे. अतिक्ति भार आणि भरधावामुळे वाळू टिप्परमधून अपघातांची संख्या गत काही महिन्यांत वाढल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आरटीओ अधिकाऱ्यांना याविषयी विचारपूस केली असता ओव्हरलोड तपासण्याचा अधिकार त्यांना नसल्याचे आरटीओंनी सांगितले.दरम्यान देगलूर बिदर मार्गावर आशा ओव्हरलोड वाळू वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशा चाळणी झाल्याचे दिसून येत आहे . यामुळे अपघाताचे प्रमाण खूप वाढले असून या मार्गावरील नागरिक जीव मोठीत धरून प्रवास करत असताना दिसून येत आहे मात्र लोकप्रतिनिधी संबंधित अधिकाऱ्यांना जाब न विचारता याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे. अशा या ओव्हरलोड वाहतुकीवर प्रशासन लवकरात लवकर कारवाई करावी अशी देगलूर परिसरातील जनतेकडून बोलले जाते.