
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा दवणे जालना, मंठा..
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटरवर सध्याच्या राजकीय परिस्थितीत विरंगुळा म्हणून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा चांगलाच सार्वत्रिक झाला आहे. या व्हिडीओत एका प्लास्टिक टेबलवर उभे राहण्यासाठी बकऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. मात्र एकही बकरी टेबलवर उभी राहू शकत नाही. सध्याच्या राजकीय परिस्थितीत असेच चित्र असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती मागील चार वर्षांपासून अस्थिर आहे. महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला असल्याचे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या चार वर्षांचा विचार केला तर भाजपा अजित पवार यांचा – पहाटेचा शपथविधी सोहळा, त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेसचे महविकास आघाडी सरकार, त्यानंतर शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे शिवसेना व भाजपा सरकार, आता एक वर्षाचा कालावधी या सरकारला पूर्ण होत नाही तोच या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची व इतर ८ जणांनी घेतलेली मंत्रीपदाची शपथ यामुळे राज्यातील राजकारण कशा प्रकारे सुरू आहे हे जनतेने अनुभवले…