
गंभीर आरोप करत म्हणाले ‘फिर्यादी मॅनेज करण्यासाठी…
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणातील आरोपी पुण्याच्या दिशेने जातानाचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
वाल्मीक कराडने 31 डिसेंबर 2024 ला शरणागती पत्करण्यापूर्वी 3 आलिशान गाड्यांमधून बीड ते पुण्यात जातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये वाल्मीक कराडची पांढरी स्कॉर्पिओ देखील दिसतीये. अशातच आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यंत्रणांवर संशय व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना भेटतात मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही? असा प्रश्न धनंजय देशमुख यांनी विचारलाय.
फिर्यादी मॅनेज करण्यासाठी दबाव
सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर धनंजय देशमुख यांनी सीआयडी एसआयटी तपासी यंत्रणावर संशय व्यक्त केला. तसेच या संपूर्ण प्रकरणात फिर्यादी मॅनेज करण्यासाठी राजकीय पावर वापरून दबाव टाकला जात असल्याचा देखील गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. बीडमध्ये बोलत असताना तपासी यंत्रणा या देशमुख कुटुंबाचा विश्वासघात करत आहेत, असा संशय धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला.
पुरावे का भेटत नाहीत? – धनंजय देशमुख
देशमुख कुटुंब पत्रकार आणि समाज हे व्हिडिओ देत असेल तर तपासी यंत्रणांकडे का नाहीत? असा प्रश्न धनंजय देशमुख यांनी विचारला आहे. व्हिडीओ आहेत मग महत्त्वाचे पुरावे का भेटत नाहीत? असा प्रश्न समाजाला पडत आहे. जिल्ह्यातच सगळे हे आरोपी होते. शिवलिंग मोराळे याची गाडी 29 तारखेपासून ताब्यात आहे. तपासी यंत्रणा या देशमुख कुटुंबाचा विश्वासघात करत आहेत, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. आरोपी हे मॅनेजमेंट साठी कामाला लागले आहेत आणि खंडणी, माराहान, खून या मधील फिर्यादीला दबावतंत्र आणि राजकीय पावर वापरुन मिटवायचा प्रयत्न सुरू आहे, असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
आरोपी कुठे कुठे गेले?
अटकेतील आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. देशमुखांच्या खुनानंतर आरोपी कुठे कुठे गेले, बीडमधून त्यांनी कसा पळ काढला, याची सगळी माहिती आणि पुरावे पोलिसांकडून गोळा केले जात आहेत. दरम्यान, खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि इतर आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीड वरून पुण्याला गेले होते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या झाल्यानंतर जवळपास 21 दिवसांनी म्हणजेच 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून तीन आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे.