
एका आंब्याची किंमत थेट ₹10,000 !
नादेडच्या भोसी गावातील सुमनबाई गायकवाड यांनी पिकवलेला ‘मियाझाकी’ आंबा सध्या चर्चेचा विषय आहे. ₹10,000 प्रति आंबा या दराने विकला जाणारा हा आंबा त्यांच्या संघर्ष आणि चिकाटीचे प्रतीक आहे.
भोसी गावातील सुमनबाई गायकवाड यांनी आपल्या शेतीत लावलेला ‘मियाझाकी’ आंबा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रत्येक आंब्याला मिळतोय तब्बल ₹10,000 चा दर! हा फक्त आंबा नाही, तर एका संघर्षातून उगम पावलेलं यशाचं झाड आहे.
नंदकिशोर गायकवाड यांनी फिलिपाईन्समधून ६,५०० रुपये देऊन १० मियाझाकी आंब्याची रोपे मागवली. दोन वर्षांपूर्वी रोपं लावण्यात आली आणि आता त्यांना मिळतंय आश्चर्यकारक फळधारणा – देशातल्या सर्वात महागड्या आंब्याचं उत्पादन!
पुण्यात यूपीएससीची तयारी करत असताना लॉकडाउनमुळे गावाकडे परतलेला नंदकिशोर इंटरनेटवर मियाझाकी आंब्याबद्दल वाचतो आणि ते त्याच्या आयुष्याची दिशा बदलणारं ठरतं. ‘ऑनलाइन शिक्षण’नं मिळालेली ही प्रेरणा आता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक भाग बनली आहे.350 ग्रॅमपेक्षा जड, रंगाने गडद जांभळा ते लालसर आणि चविला जबरदस्त. मियाझाकी आंब्यामध्ये असतो बीटा-कॅरोटीन, फॉलिक ॲसिड, आणि भरपूर व्हिटॅमिन C जे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं.
नांदेड कृषी व धान्य महोत्सवात सुमनबाई गायकवाड यांच्या स्टॉलवर मियाझाकी आंबा पाहण्यासाठी गर्दी उसळतेय. फक्त बघायला नाही तर हे रोप विकत घेण्यासाठीही शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.या आंब्याचा ‘प्रति फळ’ दर इतका उच्च का आहे? कारण त्याची दुर्मीळता, पोषणमूल्य, सौंदर्य आणि मर्यादित उत्पादन. जपानमध्ये याला “Egg of Sunshine” म्हटलं जातं आणि आता भारतातही त्याला हाच दर्जा मिळतो आहे.
गायकवाड कुटुंबानं आंब्यांची माहिती mango.com वर अपलोड केली आणि २ एप्रिल रोजी सौदी अरेबियातून थेट ग्राहक भेटायला येणार असल्याचं कळलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठवाड्यातील आंब्याला मिळणारी ही ओळख प्रेरणादायी ठरतेय मियाझाकी आंब्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो कमी पाण्यातही तग धरतो. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासारख्या भागात अशी फळझाडं शाश्वत शेतीसाठी महत्त्वाची ठरतात.
सुमनबाईंचं हे यश केवळ फळझाडांपुरतं मर्यादित नाही. त्यांच्या कुटुंबानं दिलेला साथ, मुलाचा विश्वास, आणि चिकाटी. यामुळे हा आंबा फक्त महागडाच नव्हे, तर ‘भावनात्मक’ही ठरतो. हा आंबा केवळ एक उत्पादन नाही. तो आहे एक विचार, एक संधी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिशा देणारं साधन. सुमनबाईंसारख्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मराठवाड्यातही शेतीला नवं तेज मिळतंय!