
हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका !
नांदेड: काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधला.अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये महाराष्ट्र केसरी होते, आता भाजपामध्ये जाऊन ते जत्रेतील नुरा कुस्त्या खेळत आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली.
नांदेडमध्ये काँग्रेस तर्फे तिरंगा रॅली आणि जय जवान जय किसान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांनी अशोक चव्हाणावर निशाना साधला. अशोक चव्हाण महाराष्ट्र केसरी होते पणस्व शंकरराव चव्हाण हे हिंद केसरी होते.
केंद्रात त्यांनी अनेक पदे सांभाळली, काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहिले होते. अशोक चव्हाण हे देखील काँग्रेसमध्ये असताना दीर्घकाळ आमदार खासदार राहिले. प्रदेशाध्यक्ष देखील राहिले. शंकरराव चव्हाण हे हिंद केसरी होते तर अशोक चव्हाण कॉलेज काँग्रेस पक्षात महाराष्ट्र केसरी होते.
काँग्रेस मध्ये राहून महाराष्ट्र केसरीचे कुस्त्या लढायचे, आता मात्र भाजप मध्ये जाऊन अशोक चव्हाण हे नुरा कुस्त्या खेळत असल्याची बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकणार अस चव्हाण यांनी शंखनाद सभेत म्हणाले मला त्यांच्या अवस्थेवर दुःख होतं ते मी व्यक्त केल्याचं सपकाळ म्हणाले.मुस्लिम लीगशी भाजपचे संबंधदरम्यान पाकव्याप्त कश्मीर प्रमाणे पाकव्याप्त काँग्रेस झाली आहे अशी टीका परवा नांदेड येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर सपकाळ यांनी पलटवार केला. जिन्ना यांच्या मुस्लिम लीगशी भाजपाचे संबंध होते तेव्हा भाजपने त्यांचा इतिहास पाहावा असे सपकाळ म्हणाले.
पावसामुळे मुंबई तुंबली होती, फडणवीस यांचा भ्रष्टाचार तुंबला होता अश्या शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली. सपकाळ यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काँग्रेसतर्फे आज शहरात जय तिरंगा रॅली काढण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ट्रॅक्टर चालवत तिरंगा रॅलीमध्ये सामील झाले. जय जवान जय किसानचा नारा देत आज काँग्रेसने नांदेडमध्ये तिरंगा रॅली काढली.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. मोठ्या संख्येने ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी होते. नवीन मोंढा ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. ऑपरेशन सिंदूर मुळे एका डोळ्यात आनंद तर शेतकऱ्यांच्या परिस्थितीमुळे दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.