
टीम इंडिया जिंकल्यावरही सौरव गांगुली असं का म्हणाला ?
भारत आणि पाकिस्तान सामना रविवारी पार पडला. या सामन्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर ७ विकेटसह दणदणीत विजय मिळवला. यासह भारताने आशिया कप मध्ये आपले स्थान आणखी भक्कम केलं. एकाच गटात असलेल्या भारत पाकिस्तान सामन्यावरून मोठा वाद पाहायला मिळाला.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हा सामना खेळू नये अशी मागणी भारतातील आणि क्रिकेट चाहत्यांनी केली होती. सामना पार पडला पण क्रिकेट चाहत्यांनी या सामन्याकडे पाठ फिरवल्याचे एकंदरीत स्टेडियम मधील प्रेक्षकांच्या उपस्थितीवरून पाहायला मिळालं. अशातच टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी आपण हा सामना फक्त पंधरा ओव्हरपर्यंतच पाहिल्याचं सांगितलं.
नेमकं काय कारण?
पाकिस्तान आता भारताला टक्कर देणारी टीम नाही. मी हे आदराने सांगतो, कारण मी त्यांची टीम पाहिली आहे. या टीममध्ये तो स्तर नाही. भारत क्रिकेटमध्ये पाकिस्तान आणि आशिया कपमधील कोणत्याही टीमपेक्षा खूप पुढे आहे. भारत बेस्ट टीमच राहील मी जे पाहिले, त्यावरून मला त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच वाटले नाही. मी पहिल्या १५ षटकांनंतरच सामना पाहणे बंद केले. मग मी मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी (इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये) सामना पाहणे सुरू केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये आता कोणतीही स्पर्धा नाही. आम्ही पाकिस्तानला अशी टीम म्हणून बघतो, ज्यामध्ये वकार युनिस, वसीम आक्रम, सईद अन्वर आणि जावेद मियादादसारखे खेळाडू होते, पण आजच्या पाकिस्तानसोबत तसे नाही, हे आता पूर्णपणे वेगळे आहे. कोणतीही स्पर्धा नसल्याचं सौरव गांगुलींनी म्हटलं आहे.
गांगुलींच्या या विधानामुळे क्रिकेट विश्वात बरीच चर्चा सुरू झाली आहे. अनेक क्रिकेट चाहते त्यांच्या मताशी सहमत आहेत, तर काहींना वाटते की पाकिस्तानला कमी लेखणे योग्य नाही. गांगुलींनी पाकिस्तानच्या संघाला कमी लेखू नये, कारण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. तर, काहींनी म्हटले आहे की, गांगुलींचे मत योग्य आहे, कारण भारतीय संघ सध्या खूप मजबूत आहे. एकंदरीत, गांगुलींच्या या विधानामुळे क्रिकेट विश्वात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे आहे की, पाकिस्तानचा संघ यावर कशी प्रतिक्रिया देतो आणि आगामी सामन्यांमध्ये ते कशी कामगिरी करतात.