शिक्षणमंत्री व शिक्षण आयुक्तांने लक्ष देण्याची गरज…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
महाराष्ट्रात शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून इतर अशैक्षणिक कामे देणे म्हणजे ” काम छोडो बिल्ली हाकालो” असा कारभार झाला असुन याकडे शिक्षणमंत्री दिपक केसरकर व शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी लक्ष देऊन शिक्षकांकडून शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणी व्यतिरिक्त इतर कामे देऊ नये साहेब आम्हाला शिकवू द्या , अध्यापना व्यतिरिक्त कामात गुंतवलेल्या शिक्षकांची आर्त हाक शिक्षक हा देशाचे भवितव्य घडवितो विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वाडी तांड्यावर दुर्गम भागात जाऊन गोर गरीब शेतकरी,, शेतमजूर , सामान्य माणसाचे लेकरे हे जिल्हा परिषदेच्या शासकीय शाळेत शिक्षण घेत असतात धनदांडगे ,पुढारी, अधिकारी, कर्मचारी यांचे मुले हे श्रीमंत शिक्षण सम्राटांच्या शाळेत तालुक्यावर, जिल्ह्यावर , महानगरात शिक्षण घेत असतात त्यामुळे गरिबाला कुणी वाली उरला नाही त्यातच ” दुष्काळात तेरावा महिना म्हणल्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना शासन विविध सर्वेक्षण,मतदार यादी बनविने,बीएलओ पदी नियुक्ती करणे,निवडणूक,स्वच्छता मोहीम राबवने,निरक्षर लोकांचा सर्वे स्थलांतर विद्यार्थी सर्वे,अपंग विद्यार्थांचा सर्वे,शा.पो,आहार वाटप करणे आदी विविध कामे लावीत आहेत त्यामुळे त्यांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. पूर्वी जिल्हा परिषदेचे शिक्षक हे विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यासक्रम पूर्ण शिकवून गुणवत्ता वाढीसाठी जादा वर्ग घेत असे पण आता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना काहीवेळा दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करता येईना झाला आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगात गोरगरिब विद्यार्थ्यी हे मागे राहत आहेत .
तेव्हा याकडे राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर व शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी लक्ष देऊन शिक्षकांकडून सर्व अशैक्षणिक कामे तथा,मतदार यादी, बीएलओ आदी कामे काढून घ्यावी अशी मागणी जनतेतून व शिक्षकांकडून होत आहे. शाळा सुरू 15 जून 1जुलै ते 20 जुलै सेतू अभ्यासक्रम, पूर्वचाचणी उत्तर चाचणी 21 जुलै ते 20 ऑगस्ट घरोघरी जाऊन मतदार नोंदणी शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा शाळेतील सराव चाचण्या बीटस्तरावरील चाचण्या 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पायाभूत चाचणी व त्याचा निकाल हे संपत नाही तर 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट निरक्षर सर्वेक्षण,शाळाबाह्य विद्यार्थी सर्व्हेक्षण शाळा नाही चालली तर शिक्षक जबाबदार गुणवत्ता नाही वाढली तर शिक्षक जबाबदार ,पट कमी झाला तर गुरुजी जबाबदार जिल्ह्यातील हजारो शिक्षक शिक्षणेत्तर कामामुळे किमान अडीच महिने शाळेबाहेर आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा कशा टिकतील गुणवत्ता कशी वाढेल ? अशी प्रतिक्रिया शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांनी यावेळी दिली…
