दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:यंदा महाराष्ट्रात ८ जून २०२३ मान्सून रोजी प्रवेश करणार आहे. यानंतर संपूर्ण राज्यात २२ जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डख म्हणाले, गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आणखी चार ते पाच दिवस तापमान वाढलेले राहणार आहे. सुमारे ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पोहचणार आहे. हवामानामध्ये प्रचंड उकाडा वाढणार असल्याचे डख यावेळीम्हणाले.महिन्यात पुन्हा एकदा ११ ते १६ मे दरम्यान राज्यात हवामान कोरडे रा हणार आहे. १७ मेनंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे १६ मेपर्यंत पूर्ण करून घ्यावी, असे डख यांनी शेतकऱ्यांना सांगितले. मान्सूनचा पाऊस ८ जूनला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. २२ जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्रात पडणार आहे. यानंतर २६ व २७ जूनला शेतकरी बांधवांनी खरिपाच्या पेरण्या कराव्या.
जुनपेक्षा जुलै महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येसुद्धा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज डख यांनी वर्तविला आहे.
