
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात 219 ग्रामपंचयातींचा यात समावेश असून, सोमवारपासून निवडणूक प्रकियेला प्रारंभ झाला आहे.
तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी 3 अर्ज दाखल झाले असून त्यात 2 अर्ज थेट सरपंचपदासाठी असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेने दिली आहे. उमदेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 2 डिसेंबरपर्यंत असणार आहे.
जिल्ह्यात मुदत संपलेल्या 219 ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ज्यात महिलांसाठी 50 टक्के सरपंचपदे आणि सदस्यपदे राखीव आहेत. त्यानुसार 109 किंवा 110 महिला थेट सरपंच होणार आहे. तर 1999 सदस्यांपैकी 959 किंवा 960 महिला सदस्य होतील.