दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांना हनुमान चालिसा पठण प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे.त्यामुळे राणांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण केली होती.या आंदोलनानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.खार ठाण्यात गुन्हा आणि अटकेनंतर राणा दाम्पत्याची जामिनावर सुटका झाली.कर्जे आरामात फेडू शकाल अशीच घ्या.कर्जे या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राणा दाम्पत्य हजर राहात नसल्याचं दिसून येतंय.गेल्या ११ नोव्हेंबर रोजी ठरलेल्या सुनावणीसाठी राणा हजर राहिले नव्हते.त्यामुळे कोर्टाने त्यांना वॉरंट जारी केलं आहे.हे वॉरंट जामीनपात्र असून ५ हजारांच्या जामिनावर त्यांची सुटका होईल.मात्र इथून पुढच्या सुनावणींसाठी राणा दाम्पत्याला हजर राहावं लागणार आहे.असे मुंबई सत्र न्यायालयाने हे वॉरंट जारी केले.
