दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड :- राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमध्ये पन्नास टक्के भाड्यात प्रवास करता येणार आहे.
राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना दि.१७ मार्च पासून सर्व महिलांना राज्याची हद्द आहे तिथपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये पन्नास टक्के भाड्यात प्रवास करता येणार आहे. ह्या सवलतिची प्रतिपुर्ती शासनाकडून. जारी करण्यात आली आहे.१७ मार्च पासून ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात केली होती. . या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून एक परिपत्रक काढून या योजनेची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सन. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५०टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक १७ मार्च २०२३पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे.
