
गरीब मुलांना शाळा शिकू द्या!
आम आदमी पार्टीचे आंदोलन
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :मागील चार वर्षापासून आरटीई शिक्षण देणाऱ्या अंतर्गत शिक्षण देणाऱ्या शाळांचे अठराशे कोटी रुपये सरकारने देणे आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गरीब वंचित घरातील मुलांना शैक्षणिक फटका बसत आहे असे असे सांगत आज आम आदमी पार्टीने अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने केली.
‘एकीकडे राजकीय नेते मंडळीच्या मुलांचे शिक्षण पंचतारांकित शाळात,परदेशात चालू आहे.परंतु सरकार गरीब,वंचित घरातील मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी मात्र;निधी नाही असे सांगत हात वर करीत आहे’ अशी टिका आप पक्षाच्या वतीने भैय्यासाहेब खंडारे यांनी केली.
महाराष्ट्रातील खाजगी शाळांमध्ये वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांची एक लाख मुले दरवर्षी शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत प्रवेश घेतात.आता २२-२३ शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून शासनाकडून गेल्या ४ वर्षातील सुमारे १८०० कोटी रुपये एवढी रक्कम शासनाने शाळांना न दिल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा अडचणीत आल्या आहेत.दरवर्षी शासन दिरंगाई करीत असल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते आहे. यंदा पुन्हा तशीच वेळ आली आहे असा आरोप यावेळेस भैय्यासाहेब खंडारे यांनी केला.फुले,शाहू,आंबेडकर यांचे नाव घेत राज्य करणाऱ्या शासनाच्या दरबारी मुलांना मात्र न्याय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.संविधानाने दिलेल्या शिक्षण हक्काची पायमल्ली होत आहे असे प्रतिपादन आपचे प्रफुल भटूरकर यांनी केले.
शासनाने या शाळांची थकीत शैक्षणिक शुल्क रक्कम आठ दिवसात अदा करावी व लाखो मुलांचे शिक्षण चालू ठेवावे अशी आम आदमी पार्टी मागणी करीत आहे.अन्यथा आम आदमी पार्टी राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा या वेळेस देण्यात आला.आप निदर्शनात जवळवाडी ग्रामपंचायत उपसरपंच गजानन खंडारे,प्रवीण केने,पवन सपकाळ,आदेश मोरे,आदित्य काळे,सचिन नागे,अमोल वानखडे,सागर खोलोकर,पराग सुर्वे तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी आदी सामील झाले होते.