
दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
धाराशिव/भूम (प्रतिनिधी) – भूम तालुक्यातील ब्रहाणपूर परिसरातील घाडगे वस्ती, जगदाळे वस्ती, दरेकर वस्ती, करडे व वारे वस्ती या भागातील रस्त्याची दुरवस्था झाली होती. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल व पाणी साचत असल्यामुळे शालेय विद्यार्थी, दुग्ध व्यवसायिक, शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी माजी मंत्री तथा आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ उद्योग समूह यांच्यातर्फे स्वखर्चाने रस्त्याच्या मुरमीकरण व मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले.
या कामाचा शुभारंभ शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी उपसभापती बालाजी गुंजाळ, महिला आघाडी जिल्हा प्रमुख अर्चना दराडे, वैद्यकीय जिल्हा प्रमुख पांडुरंग धस, गोरमाळा सरपंच अतुल शेळके, उळूप सरपंच विनोद वरळे, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर अर्जुन यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये दत्तात्रय जगदाळे, माजी सरपंच सुनील घाडगे, मा. सरपंच विलास पाटील, काकासाहेब पाटील, नितीन पाटील, अजित पाटील, राहुल करडे, प्रदीप शेलार, संदीप वारे, बालाजी वारे, प्रशांत पाटील, श्रीराम करडे, अश्रुबा वारे, भीमराव घाडगे, किरण पाटील, धनंजय पाटील, राजाभाऊ करडे आदींचा समावेश होता.
ब्रहाणपूर परिसरात रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून आमदार डॉ. तानाजी सावंत यांचे आभार मानण्यात आले.