टॅक्सी-रिक्षा चालकांसाठी आंदोलनाच्या मैदानात, विरोधामागे महायुतीतील अंतर्गत कलह?
1 मे पासून मुंबईमध्ये टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी सक्ती केल्यास आंदोलन करणार असा इशारा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
जनसंघाचे सर्वेसर्वा दत्तोपंतजी ठेंगणे यांच्या विचार सरणीतून वकील गुणरत्न सदावर्ते आंदोलन करणार आहेत. मुंबईतील पाच लाख रिक्षाचालक टॅक्सीचालक यांच्या मागे आपण उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालक यांना मराठी सक्ती करण्याच्या विरोधात सदावर्ते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या विरोधामागे महायुतीतील अंतर्गत कलह तर नाही ना, अशी चर्चाही सुरू झाली आहे.
वाहन परवाना घेताना मराठी भाषेचे प्रमाणपत्र आवश्यक?
दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक सुरू आहे. 1 मे पासून संपूर्ण राज्यभर टॅक्सी आणि रिक्षा चालक त्यांच्यासाठी मराठी सक्तीच्या निर्णयावरून ही बैठक सध्या सुरू आहे. या बैठकीमध्ये मंत्री प्रताप सरनाईक परिवहन आयुक्त नार्वेकर तसेच इतर रिक्षाचालक टॅक्सी चालक संघटनेचे काही पदाधिकारी व तज्ञ लोक असल्याची माहिती समोर येत आहे.
या बैठकीत काही भाषा तज्ज्ञ देखील आहेत. आजच्या बैठकीत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी मराठीच्या अभ्यासक्रमा बाबत चर्चा होणार आहे. मोठ्या प्रमाणात ॲाटो रिक्षा, ओला, उबर, रॅपीडो अश्या सगळ्या परिवहन सेवा आहेत. पण तरीही वाहतुकीवरील ताण वाढत आहेत. आधी पासून परिवहन विभागाचे भाषेविषयीचे धोरण आहे. अनेकांनी मला याबाबत फोन करून सांगितल्याचे सरनाईकांनी स्पष्ट केले.
आमिर खानला मराठी शिकविणारी, जेनेलिया हीला सुद्धा मराठी शिकविणारी ही मंडळी आहेत. २२ विभाग आम्ही एक अभ्यासक्रम तयार करतील आणि नतंर तो आपल्याला देतील. मेहेंदळे यांनी मराठी भाषेसाठी अनेक उपक्रम राबविले आहे. मराठी भाषा शिकल्यावंतर मराठी राज्य शासनाचे मान्यता प्राप्त प्रमाणपत्र देतात. उद्या लायसन्स देताना वाहनधारकांकडे असे प्रमाणपत्र सुद्धा आम्ही अनिवार्य करू शकतो, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
मराठीसाठी दोन पानी पुस्तिका
काही लोक फक्त मराठी येत राजकारण करण्यासाठी आम्ही मराठी शिकवतो असे फलक लावतात दुसऱ्या दिवशी तो फलक आणि तो वर्ग गायब होतो, असा टोला सरनाईक म्हणाले. मराठी भाषा शिकण्यासाठी आपण दोन पानी पुस्तिका तयार करणार आहोत. १६ तारखेला जी बॅंकेचा अध्यक्ष त्यांच्या ताब्यातून गेल्यामुळे ते फ्रस्टेट झाले आहेत. मी २८ एप्रिल रोजी बैठक बोलावणार आहे. त्यावेळी मी शशांक राव सह सगळ्या युनियन यांना बोलावणार आहे. त्यावेळी या सगळ्यावर बोलणार आहे. आमच्या आरटीओ च्या अधिकारी यांनी पण काही चुकीचे परवाने किंवा परमिट दिले असतील तर त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा सरनाईक यांनी केला. महाराष्ट्रात व्यवसाय करणार असाल तर तुम्हाला मराठी यावेच लागेल. महाराष्ट्रात राहून मराठी शिकणार नाही अशी मुजोरी चालणार नाही, अशी समज त्यांनी दिली.
