
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
कंधार:- कंधार तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून सतत पावसामुळे अनेक शेतकऱ्याच्या पिकाचे फार मोठे नुकसान झाल्याचे चित्र कंधार तालुका सह जिल्ह्यात पहण्यास मिळत सतत च्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ह्या मुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर संकट आले आहे कंधार तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सतत पावसामुळे व पूर परिस्थिती मूळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आदिच शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्या कारणामुळे शेतकऱ्याचे डोकेदुखी वाडल्या कारणामुळे अनेक या तालुक्यातील अनेक शेतकरी तर मोठ्या संकटामध्ये अटकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तालुक्यातील शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा करत असल्याचे शेतकऱ्याकडून ऐकण्यास मिळत आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि पिक या मुसळधार पावसामुळे गेल्यामुळे सरकारकडे कर्जमाफी व नुकसान झालेल्या भरपाई मिळण्याची अपेक्षा सरकारकडे संभाजी ब्रिगेड कंधार तालुका अध्यक्ष नितीन पाटील कोकाटे यांनी केली आहे