दैनिक चालु वार्ता म्हसळा- रायगड प्रतिनिधी- अंगद कांबळे
शिकाल तर टिकाल आणि”पुस्तक”वाचल तर वाचाल हे ब्रीद वाक्य असले तरी ते खरे आहे.पुस्तक वाचून ज्ञान संपत्ती वाढविण्यासाठी जगात मुबलक ग्रंथ साठा आहे आपण तो हाताळला पाहिजे,वाचला पाहिजे.चल-अचल संपत्ती वाटली तर ती संपते मात्र पुस्तक वाचून ज्ञान संपत्ती वाटली तर ती वाढते त्याच साठी वाचन संस्कृती जोपासण्याची गरज आहे.वाचनालयाचे माध्यमातून वाचन महत्व देवुन जागतीक पातळीवर अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत म्हणुन २३ एप्रिल हा दिवस खास करून विश्व पुस्तक दिवस साजरा करण्यात येतो.आपल्याकडे असलेले किंवा अवगत झालेले ज्ञान “कॉपी राईट”करणे अर्थात ग्रंथात नमुद करुन ते सर्वांना पुस्तक रुपात अवगत होण्यासाठी प्रसिध्द करणे बाबतची माहिती म्हसळा सार्वजनिक वाचनालयाचे विश्वस्त वसंतराव नाईक कॉलेजचे ग्रंथपाल प्रा.रायप्पा माशाले यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन माहिती देताना सांगीतले.म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयाच्या उपाध्यक्षा सौ अपर्णा ओक यांच्या अध्यक्षतेखाली विश्व पुस्तक दिवस साजरा करण्यात आला या वेळी कार्यक्रमाचे आयोजक संचालक सदस्य सुनिल उमरोटकर, सचिव अशोक काते,जेष्ठ संचालक अ.रजाक् मेमन,ग्रंथपाल उदय करडे,वाचक रविंद्र मुद्गुळ,संभाजी शिंदे,श्रीमती प्राची उपस्थित होते.या वेळी प्रा.माशाले यांनी मराठी साहित्यीक,लेखक,कवी,कादंबरीकार,नाटककार,चरित्र,आत्मचरित्र,काव्य संग्रह,कवी,कवयित्री यांच्या साहित्याची माहिती विषद करून देताना खास करून शांता शेळके यांनी लिहिलेले नापास मुलांची गोष्ट,किरण बेदी यांचा आम डेरर,बेडेकर यांचा रणांगण,विश्वास पाटिल यांचा महानायक,दिवे गेलेले दिवस आदी पुस्तकातील लेखकांचे दर्जेदार लेखनाची सविस्तर माहिती दिली.पु.ल.देशपांडे,व्यंकटेश माडगुळकर,सुधीर फडके,वि.स.खांडेकर,वि.ग.कानिटकर,भालचंद्र नेमाडे,गोविंदाग्रज,राम गणेश गडकरी,सेक्सपियर,डॉ बाबासाहेब आंबेडकर,साने गुरुजी,शिवाजी सावंत,आण्णा भाऊ साठे,हरी नारायण आपटे, रणजित देसाई यांच्या लेखन साहित्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे आयोजक सुनिल उमरोटकर यांनी पुस्तक वाचना बरोबरच मंत्पुष्पांजली वाचुन ते सातत्याने मनन केल्यास शारीरिक व्याधी दूर होण्यासाठी मदतीचे होते अशा प्रकारच्या साहित्यात काही कमी नाही याची माहिती देताना सांगीतले.पुस्तक हे ज्ञानाचे भांडार आहेत आजच्या विज्ञान,तंत्रज्ञान युगात जगताना दैनंदिन जीवनात पुस्तक वाचनाला विशेष महत्व देवुन वाचन संस्कृती जोपासण्यासाठी जागतीक स्तरावर प्रचार आणि प्रसार केला पाहिजे असे मत मेमन यांनी व्यक्त केले.उपस्थित मान्यवरांचे हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले. स्वागत व आभर सचिव अशोक काते यांनी मानले.
