
दैनिक चालु वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी -राम चिंतलवाड
हिमायतनगर:- तालुक्यातील मौजे मंगरुळ येथील सरपंच प्रतिनिधी जिवन दादा जैस्वाल यांनी समाजासाठी आपण काही तरी देणं लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून. गावातील आदिवासी समाजातील लहान पणीच आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या एका मुलाचे लग्न लावून देण्यासाठी जिवन जैस्वाल यांनी समोर येवुन स्वखर्चाने संपुर्ण खर्च उचलुन त्या लहान पणी आई वडीलांचे छत्र हरवलेल्या अनाथ मुलांचे लग्न लावुन दिले. याबाबत सविस्तर वृत्त असे की.मंगरुळ येथील रहिवासी नवरदेव बालाजी हातमोडे या तरुणाचे आई वडील तो लहान असतानाच त्याला सोडुन देवाघरी गेले.त्याचे पालण पोषण त्याच्या मामा मामीने केले .घरची परिस्थिती बेताची लोकांच्या रोजंदारीवर काम करुन कसा बसा उदरनिर्वाह होतो.पण लग्न म्हणले कि खर्च येणारच या काळजीत असतांना हि बाब मंगरुळ गावचे तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच प्रतिनिधी जिवन दादा जैस्वाल यांच्या निदर्शनास आली.त्याच क्षणी मागचा पुढचा विचार न करता स्वतः पुढे होवुन माहुर तालुक्यातील मुंगशी येथील रहिवासी शकुराव लोडबा तिळेवाड यांची मुलगी वर्षा हिच्यासोबत सोयरीक झाली. सोयरिकिपासुन ते लग्न समारंभ पार पाडेपर्यत स्वतः उपस्थित राहुन स्वखर्चाने लग्न समारंभ पार पाडला.बालाजी हातमोडे व वर्षा तिळेवाड यांच्या विवाह तालुक्यासह परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.सर्व स्तरातुन जीवन जैस्वाल यांच्या कार्याचे कौतुक केल्या जात आहे…!