
प्रतिनिधी अबंड
ज्ञानेश्वर साळूंके
फलटण शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील नागेश्वरनगर-चौधरवाडी येथील मुंबई शहर पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी सौ. ऋतुजा सुशांत रासकर (वय २२ रा. नागेश्वर-नगरचौधरवाडी ता.फलटण जि.सातारा.) असे या गळफास घेवुन आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ऋतुजा रासकर यांनी आपल्या राहत्या घरी शनिवारी दुपारच्या सुमारांस घरातील लोखंडी अँगलला नायलॉनच्या रसीने गळफास घेवुन आपले जीवन संपवले, त्या मुंबई शहर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होत्या. पोलिसांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन बाळू रासकर फिर्यादीवरुन मी आणि माझी पत्नी तसेच मुलगा आणि सून ऋतुजा असे आम्ही एकत्रित राहत होतो. मुलगा सुशांत हा खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतो तर माझी पत्नी फळ विक्रेतेचा व्यवसाय करते. माझी पत्नी ताई रासकर ही जिंतीनाका येथे फळांची विक्री करण्यासाठी गेली होती. तर मुलगा गाडी घेवुन बाहेरगावी गेला होता. शनिवारी दुपारीच्या सुमारांस बाहेर पाऊस येत असल्यांने बाहेरील कपडे ऋतुजाने घरात नेले त्यानंतर पाळीव मांजर बांधायच्या कारणांने मी ऋतुजाच्या खोलीकडे गेलो असता हाका मारल्या मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही अखेर दरवाजा ढकलला होता. म्हणून मी दरवाजा उघडून पाहिले असता सनू ऋतुजा हिने गळफास घेतल्यांचे निदर्शनांस आले त्यानंतर मी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले आणि घराशेजारील सौरभ बनसोडे यांच्या समवेत फलटण शहर पोलीस ठाणे गाठले पोलिसांनी घटनास्थळी येवुन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. मात्र महिला पोलीस सौ. ऋतुजा रासकर हिने कोणत्या कारणांतून आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरांतून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यांत आकस्मिंत मृत्यू म्हणून नोंद झाली अधिक तपास पोलीस करीत आहेत…