
मग मतदार डोळे मिटायला मोकळे….
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
अजित पवार यांनी काही आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला. व्हॉट्सअप, फेसबुक, टि्वटर सोबतच अन्य सोशल मीडियावर काही आक्रमक, तर काही संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
आम्ही जनसामान्य जनता विश्वासाने एका पक्षाला मतदान करतो ; परंतु आमच्या मताला कुठेही किंमत राहत नाही. सत्तेसाठी राजकारण कुठल्याही पातळीपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मताला किंमत राहिली नाही हे सिद्ध होत आहे. आता हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी उरलेत. हे एकत्र आले की आपण मतदार डोळे मिटायला मोकळे..! अशी एक प्रतिक्रिया आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून मतदार मांडत असल्याचे दिसून येत आहे.
अण्णा हजारे यांचा फोटो वापरून कोणाविरुद्ध उपोषण करावं तेच कळत नाहीये. एवढेच नव्हे तर सासुसाठी वेगळे राहिलो आणि सासूच वाटणीला आली अशाही प्रतिक्रिया येत आहेत.
सोशल मीडियावर जुने व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘कदापि राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. एक वेळ अविवाहित राहू पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही’, असे म्हणाले होते. तीच आठवण आज करून दिली जात आहे. कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचा एक जुना व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यात ते म्हणतात, ‘कार्यकर्त्यांवर लई वाईट दिवस आले. आपण ज्यांचे भोंगे बांधले तेच गेले दुसर्या पक्षात. आशा प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून येत आहेत.
महाराष्ट्र राज्यात सत्तेत कोण आणी विरोधी पक्षात कोण हेच जनसामान्य जनतेला कळेनासे झाल्याने जनसामान्य जनता, शेतकरी , बेरोजगारी ,वाढती महागाई , यावर न बोलता जो तो येतो आपलीच पोळी भाजून घेतो सत्ताधारी तुपाशी तर जन सामन्य उपाशी आशा प्रतिक्रियांचे पडसाद सामान्य जनतेतुन सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटत आहेत.