
आरोप होताच तातडीनं कोकाटेंसह सात मंत्र्यांच्या OSD आणि खासगी सचिवांची नेमणूक…
फिक्सर ओएसडी आणि खासगी सचिवांना मंत्रालयाच्या बाहेर ठेवणार असा दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळला. आरोप प्रत्यारोपानंतर मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा सात मंत्र्यांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंसह सात मंत्र्यांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे.
राज्यातील मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमणुकीवरून राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले होते. ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर ओएसडी आणि खासगी सचिव नियुक्तीचे आरोप करण्यात आलं होते. त्यानंतर तातडीने काल रात्री उशिरा यासंदर्भात मोठा निर्णय घेत मंत्र्यांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, सात मंत्र्यांचे ओएसडी आणि दोन मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. अद्यापही अनेक मंत्र्यांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नियुक्ती बाकी आहे. मंत्र्यांनी दिलेल्या नावाची छाननी होऊनच मग नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
मंत्री गणेश नाईक, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री माणिकराव कोकाटे आणि बाबासाहेब पाटील यांच्याकडे विशेष कार्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मंत्री जयकुमार रावल आणि इंद्रनील नाईक यांच्या खासगी सचिवांची नियुक्तीचे सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.
ओएसडीची यादी
– डॉ भवानजी आगे पाटील – विशेष कार्यकारी अधिकारी (मंत्री गणेश नाईक)
– अनिल गागणे – विशेष कार्यकारी अधिकारी (मंत्री मंगलप्रभात लोढा)
– प्रशांत पाटील – विशेष कार्यकारी अधिकारी (मंत्री जयकुमार रावळ)
– राजेश मोरे – विशेष कार्यकारी अधिकारी (मंत्री आशिष शेलार)
– डॉ. सुबोध नंदागवळी – विशेष कार्यकारी अधिकारी (मंत्री माणिकराव कोकाटे)
– मंगेश पिसाळ – विशेष कार्यकारी अधिकारी (मंत्री बाबासाहेब पाटील)
– प्रशांत खेडेकर – खासगी सचिव ( मंत्री इंद्रनील नाईक).
फिक्सरांना स्थान नाही – कोकाटेंना मुख्यमंत्र्यांनी खडसावले
‘आमचे ओएसडी आणि पीएस सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच नाही,’ असं वक्तव्य कोकाटे यांनी केलं होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिलं होते. कोकाटेंना कदाचित माहिती नसेल की, ओएसडी आणि पीएस नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यासंदर्भात जो काही प्रस्तावर असेल तो मंत्री मुख्यमंत्र्यांकेड पाठवतात. मग मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय देतात. हे काय नव्याने होत नाही. मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होते. तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा. पण त्या यादीमध्ये ज्यांच्या नावांचा उल्लेख चुकीच्या कामांमध्ये असेल. त्यांना मी मान्यता देणार नाही. आत्तापर्यंत माझ्याकडे 125 नावं माझ्याकडे आली आहे. त्यामधील मी 109 नाव क्लिअर केली आहेत. उर्वरीत नावांवर कोणते ना कोणते तरी आरोप आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे. कोणीही नाराज झालं तरी मी अशांना मान्यता देणार नाही. असं स्पष्ट मत कोकाटेंच्या वक्तव्यावर फडणवीसांनी मांडलं