दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वाशिम रिसोड -भागवत घुगे
रिसोड सेनगाव तालुक्यासह मांडवा मोरगव्हाण वाडी भर जहाँगीर चाकोली परीसरात हळद पिकाची दरवर्षी मोठ्या प्रमाणत लागवड केली जाते. तर याही वर्षी मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे. सध्या या भागात हळद काढणीला सुरुवात झाली आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे हळद काढणीसाठी शेतकऱ्यांची दमछाक होताना दिसत आहे.
आतापर्यंत अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा परिणाम पिकांवर झाला होता. तर आता पीक काढणीनंतर सर्वकाही शेतकऱ्यांसाठी संपले असे नाही. कारण अनियमित पावसाने उसंत घेतली असली तरी विदर्भ मराठवाड्यात उन्हाचा पारा सध्या हा वाढतच आहे
सध्या सेनगाव पानकनेरगांव खुडज शिंदेवाडी
परिसरात हळद काढणीची कामे जोमात सुरु आहेत. काढणीनंतर हळद पक्की बनवण्यासाठी शिजवणे गरजेचे आहे. सध्या उन्हाच्या झळा शेतकऱ्यांना सहन होत नसल्याने हळदीवर रात्रीतून प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे दिवसा काढणी कामे आणि रात्रीतून हळद
शिजवणे असा प्रकार सध्या शेतशिवारात पहावयास मिळत आहे. हळद काढणीनंतर पक्की बनवण्यासाठी ती शिजवणे गरजेचे आहे. वाफेवर ही हळद शिजवण्यासाठी कुक्कर लावला जातो. या कुकरला जाळण घालून निर्माण होणाऱ्या वाफेवर ही हळद शिजवली जाते. याकरिता शेतकऱ्यांना रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे. शिवाय ही प्रक्रिया केल्याशिवाय हळद पक्की होतच नाही. उन्हापासून बचावासाठी सायंकाळी सहा नंतर शेतकरी वाफेची भट्टी सुरू करीत आहेत. तसेच भट्टी पेटवल्यानंतर दोन तासानंतर वाफ तयार होण्यास सुरवात होते आणि त्या वाफेवर मग हळदी वर प्रक्रिया
हळद पीक जोमात काढणी सुरू असताना पावसाळ्यात जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे हळद क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने कंद सडले गेले तर काही ठिकाणी हळदीला कीड लागली असल्याने आढळून येत आहे. त्यामुळे खराब अवस्थेतील पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे
…….. माणीक गरकळ पोलीस पाटील
शेतकरी मांडवा
केली जाते. हळद काढणीची कामे झाली आहेत. आता हळद शिजवण्यासाठी शेतशिवारात भट्ट्या पेटल्या आहेत. पण ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कारण वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी पण खालावली आहे त्यातच महावितरण विभागाकडून अघोषित भारनियमन सुरू आहे. तसेच ग्रामीण भागात
भारनियमनाच्या व्यतिरिक्तसुध्दा अवेळी बत्तीगुल होत असल्याने शेतकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. त्यात सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे कधी पाऊस येईल आणि नुकसान होईल या भीतीपोटी दिवसभर हळद काढणी कामे आणि रात्रीतून ही प्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांची दमछाक होताना दिसून येत आहे.