
जयंत पाटील काय बोलले ?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. बिहार निवडणूकीपूर्वी मतदार याद्यांमध्ये गोंधळ असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत भाष्य केले आहे. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी यावर भाष्य केले आहे.
पत्रकार परिषदेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, ही चांगली गोष्ट आहे की, फडणवीसांनी हे मान्य केले की, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. आमची अशी इच्छा आहे की, त्यांना मतदार याद्यांवर संशय असेल, तर त्यांनी आमचा जो प्रयत्न सुरू आहेत, ज्यात सामील व्हायला हवे आणि निवडणूक आयोगाला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले होते?
राहुल गांधी म्हणत आहेत, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. हे आम्हालाही मान्य आहे. आम्ही तर इतक्या वर्षांपासून सांगतोय. आमची मागणी होती की, मतदार यांद्याचे सर्वसमावेश पु्र्नपडताळणी करा. आता निवडणूक आयोगानेही सर्वसमावेशक पडताळणी करायला तयार आहोत, असे म्हटले आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दरम्यान, या वेळी फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका देखील केली होती.