दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड,( मुक्रामाबाद )
नऊ महिन्यापासून अनुदान बंद. मरण मागत आहे. पण देव मरणही देत नाही.
अठरा विश्व दारिद्रय पाचविला पुंजलेले…त्यात घरातील कर्ता पुरूष गेला…तेव्हापासून संसार उघड्यावर पडला… वय वाढत गेलं काम होत नाही … घरात खायाला अन्न नाही …पोटाची भूक राहात नाही … दोन-दोन दिवस उपाशी पोटी राहून दिवस काढते आहे… निराधार योजनेचा आधार मिळेल असे वाटत होते.पण तेही अनुदान बंद झाल्यामुळे घरात खायाला अन्नाचा कण नाही … तहसिलदार यांना अनेकदा भेटलो पण तहसिलदारही काम करत नाही… उपाशी पोटी राहु शकत नाही .. देवाने मरण दिले तर बरे पण देवही मरण देत नाही… ह्दय पिटाळून लावणारी ही,व्यथा आहे. मुखेड तालुक्यातील सावळी येथील मथुराबाई गोविंद येळगे, या वयोवृद्ध आजीची…
सन १९८० पासून राज्य सरकार कडून राज्यातील गरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते त्यापैकी एक महत्वकांक्षी योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना ही, असून या योजनेअंतर्गत स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असणाऱ्या निराधार व्यक्तींना या योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य देण्यात येते. ६५ वर्षाहून अधिक वय असणारे वृद्ध, निराधार पुरूष, दहा वर्षापेक्षा कमी वयाची मुले असणाऱ्या निराधार व आर्थिकदृष्टया असमर्थ, विधवा स्त्री, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले लाभार्थी आदींना या निराधार योजनेच्या माध्यमातून आधार देऊन
त्यांचे जीवान मान उंचावण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे अनेक गरीबांना जगण्याच्या अशा पल्वीत झाल्या आहेत. पण मुखेड तालुक्यातील सावळी येथील वयोवृध्द व असाह्य असणाऱ्या मथूराबाई गोविंद येळगे, या निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पाञ असतानाही केवळ तहसिदार व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी पणा मुळे यांना गेल्या नऊ महिन्यापासून मिळणाऱ्या मानधनापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. तालुक्यातुन ६० ते ७० वयोवृद्ध महिलांना मानधन मिळत नाही. त्यामुळे यांच्यावर आज उपास मारीची वेळ आली असून सावळी येथील असल्यामुळे व तिचे अन्न , पाण्यावाचून होत असलेले हाल बघावत नसल्यामुळे गावातील नागरिकांनी माणूसकी धर्म पाळत त्यांना अन्न व इतर होईल तेवढी मदत करत आहेत. पण गेल्या नऊ महिन्यात या निराधार महिलेचे अनुदान नियमित चालू करण्यासाठी माझी सरपंच श्रीकांत काळे, यांनी मथुराबाई येळगे ,यांना घेऊन तहसिलदार यांची अनेक वेळा भेट घेऊन रोखण्यात आलेले पैसे देण्याची विनंती केली. पण तसिलदार यांना या महिलेचे आजपर्यंत काही दुःख समजले नाही. हे, दुर्देवच म्हणावे लागेल. आज या महिलेला शासनाच्या कोणत्याच योजनेचा आधार नाही. जगावे तर कसे..? असा प्रश्न आज या वृद्ध आजी समोर उभा टाकला आहे. निधान सरकार कडून राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार या महत्वकांक्षी योजनेचा तरी लाभ या असाह्य वयोवृध्द आजीला मिळावा. नाहीतर अन्न ,पाण्यावाचून या आजीचा मृत्यू होईल अशी चिंता गावक-यांमधून व्यक्त आहे.
पण तहसिल कर्मचाऱ्यांच्या नाकार्तेपणामुळे या आजी संजय गाधी निराधार योजनेपासून वंचीत राहिलेली असून त्यांच्यावर आज उपास मारीची वेळ आलेली आहे.
या योजनेतून मिळणाऱ्या मानधनावर माझे आयुष्य कसेतरी जगत होते. पण गेल्या नऊ महिन्यापासून मानधन बंद केले असल्यामुळे आज माझ्यावर उपास मारीची वेळ आलेली आहे. घरात दुसरे कोणीही नाही. देव मरणही देईना. अन् तालुक्याचा साहेब पासबुकर पैसेही टाकणा.मग म्या जगू कशी.? मला सांगा.
मथुराबाई येळगे, सावळी
या वयोवृध्द आजीचे बंद करण्यात आलेले मानधन चालू करण्यासाठी यांना सोबत घेऊन तहसिलदार यांची दहा ते आकरा वेळेस प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीची जाणीव करून दिली.पण तहसिलदार यांनी आम्हांला उध्दट पणाची भाषा वापरून घरी पाठवले आहे.
